"ती" आहे म्हणून सारे 'विश्व' आहे,
"ती" आहे म्हणून 'घर' आहे,
"ती"आहे म्हणून 'सुंदर नाती' आहेत,
आणि केवळ "ती" आहे,
म्हणून "नात्यांमध्ये प्रेम" आहे...
💐जागतिक महिला दिनाच्या हार्दीक शुभेच्छा.💐
Marathi culture, literature, recipes, interpretation, short stories, movies, lyrics and discussion for the Marathi community in the US and world over. -- लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
Showing posts with label marathi. Show all posts
Showing posts with label marathi. Show all posts
Sunday, March 8, 2020
Sunday, December 29, 2019
Pune Jokes - अचाटबुध्दी संपन्न पुणेकर
😜 अचाटबुध्दी संपन्न पुणेकर ! 😜
*****
पुण्यात विकल्या जात असलेल्या प्रत्येक जिन्नसचे काही ना काही वैशिष्ट्यं असावेच लागते.
😜 खजूर सगळ्या महाराष्ट्रात मिळतात पण . .
‘आमचे येथे रसाळ खजूर मिळतील’
हे फक्त पुण्यात !
😜 एरवी जर्दाळू सगळीकडे ..
पण “पौष्टिक जर्दाळू” फक्त पुण्यात मिळतात !
😜 केशरात ‘असली’ केशर फक्त पुण्यात.
😜 सौजन्य म्हणून चहात वेलची घालायची पद्धत उभ्या
भारतात असली ..तरी ‘वेलचीयुक्त चहा’ ही पाटी फक्त पुण्यात दिसते.
😜 परवा पेणला गेलो तेंव्हा तिथे पाटी पाहिली -
‘गणपती कारखाना’ पण तेच पुण्यात बघितले तर
“आमचे येथे पेणच्या सर्वांगसुंदर गणेश मुर्ती मिळतील”!
😜 एकदा अप्पा बळवंत चौकात चालत असतांना
“चातुर्मासानिमित्त उत्कृष्ट प्रतिच्या दासबोधावर पाच टक्के घसघशीत सूट” अशी पाटी वाचल्यावर उत्सुकतेनं दुकानात शिरलो. उत्सुकता ही की उत्कृष्ट प्रतीचा वेगळा काही दासबोध समर्थांनी खास या दुकानाच्या प्रमोशनसाठी लिहीलाय की काय?
चौकशी अंती कळलं की उत्कृष्ट प्रतीचा म्हणजे कापडी बांधणीतला दासबोध ! समर्थ रामदासांच्या नशीबानं मजकूरात बदल नाही.
😜 शनिपाराजवळच्या एका दुकानासमोरच्या पाटीवरचा मजकूर वाचून मी कोलमडायच्याच बेतात होतो..
ती पाटी म्हणजे “येथे टिकाऊ आणि दर्जेदार जानवीजोड मिळतील” !!!!
😜 आणि अजुन एक ..
"आमच्याकडे दणकट पायजमा आणी मुलायम बंडी मिळतील" अशी ही पाटी होती.
पुण्यात याची देही याची डोळा पाहिलेल्या दोन अविस्मरणीय पाट्या
😜 येथे खास मालवणी पद्धतीने बनवलेले ओरिजनल चायनीज मिळेल.
पुढील अजुन कहर...
😜 येथे सेकंडहॅंड कवळ्या स्वस्तात मिळतील !!!!
😜 येथे गेलेल्या फटाक्यांना वाती लाउन मिळतील !
Climax ...
😜 एका दुकानात "येथे वैकुंठालंकार मिळतील"
असे लिहिले होते. मी उत्सुकतेने पाहिले की काय असेल तिथे तर काय सांगू!
अंत्यविधीला लागणा-या सामानाचे ते दुकान होते
अचाट बुध्दीचे धनी असणाऱ्या सर्व पुणेकरांना समर्पित!
Wednesday, January 25, 2017
Wangi premachi kahani
कुणास ठाऊक का पण मला "वांगी" लै भारी फळभाजी वाटते...
वांग्यावरील प्रेमापोटीच मला वांग-मय फार आवडत...
एकतर वांगी सर्वत्र सहज उपलब्ध असतात, त्यांना atittitude वगैरे काहीही नसतो आणि भाजीच्या टोपलीत वांग पद्मनाभाच्या मूर्तीप्रमाणे मुकुट घालून कायम निवांत निजलेलं असत...
वांग तस पूर्णतः नॉन-ग्लॅमरस पात्र...
पूर्वी टीव्हीवर भाज्यांचं एक कार्टून यायचं, त्यात वांग हे अट्टल दारुड दाखवायचं, बघताना लै मजा यायची...
मांसाहारी पार्टीत शाकाहारी मित्रांचा एकमेव आधार म्हणजे भरिताची पोट सुटलेली स्थूल वांगी...
वांगी बघून कुणालाही फार आनंद होत नसला तरी दुःखही होत नाही. शिवाय वांग्याची भाजी अतिशय सहज रेसिपी. कांदा-लसूण पेस्ट, टमाटर, मिर्ची, हळद, तिखट मीठ घालून त्यात वांग्याच्या फोडी घालून थोडं पाणी घातलं आणि वरून मटण मसाला घातला की जगातील साऱ्या भाज्या त्यापुढे झक मारतात...
वांग्याच्या लंबुळका आकार पाहून मला "बिना पायल के ही बजे घुंगरू" गाण्यातील संजय कपूरची "क्या तुने किया जादूsss" म्हणतानाची हनुवटी आठवते. त्यावेळी त्याचा चेहरा हा लंबुळक्या वांग्याप्रमाणेच दिसतो. त्यात त्याची को-स्टार माधुरी दीक्षित, म्हणजे फुल्ल पनीर बैगन मसाला...
Marathi Mathematics Joke
आता तर हद्दच पार झाली गणिताची...
गणित विषयामध्ये सुञे पाठ होण्यासाठी उखाणा उपक्रम.
१) महादेवाच्या पिंडीसमोर
उभा आहे नंदी
आयताचे क्षेञफळ =
लांबी x रूंदी.
२) हिमालयातील काश्मिर
म्हणजे भूलोकातील स्वर्ग,
चौरसाचे क्षेञफळ म्हणजे
बाजूंचा वर्ग.
३) देवीची ओटी भरू
खणानारळाची,
ञिकोणाचे क्षेञफळ =
१/२xपायाxउंची.
४) स्वातंञ्याची पहाट म्हणजे
१९४२ ची चळवळ,
(सहा बाजू) वर्ग.....
हे घनाचे पृष्ठफळ
गणित विषयामध्ये सुञे पाठ होण्यासाठी उखाणा उपक्रम.
१) महादेवाच्या पिंडीसमोर
उभा आहे नंदी
आयताचे क्षेञफळ =
लांबी x रूंदी.
२) हिमालयातील काश्मिर
म्हणजे भूलोकातील स्वर्ग,
चौरसाचे क्षेञफळ म्हणजे
बाजूंचा वर्ग.
३) देवीची ओटी भरू
खणानारळाची,
ञिकोणाचे क्षेञफळ =
१/२xपायाxउंची.
४) स्वातंञ्याची पहाट म्हणजे
१९४२ ची चळवळ,
(सहा बाजू) वर्ग.....
हे घनाचे पृष्ठफळ
Tuesday, January 17, 2017
कृष्णाने सांगितलेले कलियुग काय आहे?
कृष्णाने सांगितलेले कलियुग काय आहे?
एकदा चार पांडव (युधिष्ठीर वगळता) भगवान श्रीकृष्णाला विचारतात- "कलियुग काय आहे आणि कलियुगात काय होईल?"
या प्रश्नावर कृष्ण हसला आणि म्हणाला,"कलियुगात काय परिस्थिती असेल त्याचे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो.
" असे म्हणून त्याने आपल्या भात्यातून चार बाण घेतले आणि धनुष्याच्या सहाय्याने चार वेगळ्या दिशेला सोडले आणि चारही पांडवांना ते बाण घेवून येण्याची आज्ञा दिली.
सर्व चारही पांडव बाणाच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने गेले.
जेव्हा अर्जुनाने बाण शोधून तो उचलला तेव्हा त्याला मंजुळ आवाज ऐकूआला तो त्या आवाजाकडे वळला त्याने पाहिले एक कोकिळा खूप गोड आवाजात गात आहे पण त्याचवेळी जिवंत सशाचे मांस खात आहे, तो ससा खूप वेदना सहन करत आहे.
या दैवी पक्षीचे हे घृणास्पद कृत्य पाहून अर्जुनाला धक्का बसला त्याने ते ठिकाण पटकन सोडले.
भीमाने ज्या ठिकाणाहून बाण उचलला त्या ठिकाणी पाच विहिरी होत्या.
एका विहरीभोवती चार विहीरी होत्या.
चार विहिरीतील गोड पाणी त्यांच्यात साठून राहू शकत नसल्याने त्या विहिरीबाहेर पडत आहे.
पण आश्चर्याची बाब म्हणजे या चारही विहीरी पूर्ण भरून वाहत असताना मात्र मधे असेलेली विहीर कोरडी होती.
हे पाहून भीम चक्रावून गेला.
नकूल जेव्हा बाण घेवून माघारी येत होता तेव्हा त्याने एक ठिकाणी पाहिले की एक गाय वासराला जन्म देत आहे.
जन्म दिलेल्या वासराला ती गाय चाटू लागली.
पण ते वासरू स्वच्छ झाले तरी गाय चाटतच राहते.
खूप मुश्किलीने लोक त्या वासराला गायीपासुन वेगळे करू शकले.
तेव्हा ते वासरू खूप जखमी झाले होते.
हे पाहून नकूल गोंधळून गेला.
सहदेवाने एका डोंगराजवळून बाण उचलला आणि पाहिले एक मोठ्ठी शिळा खाली कोसळत आली.
ती शिळा खाली येताना वाटेत येणाऱ्या मोठमोठ्या झाडांचा, दगडांचा चुराडा करत होती पण तीच शिळा एका लहान रोपामुळे थांबली.
यावेळी सहदेवही चकीत झाला.
या चौघांनी या सर्व घटनांचा अर्थ श्रीकृष्णाला विचारला.
श्रीकृष्ण हसला आणि अर्थ सांगितला.
"कलियुगात धर्मगुरूंचा आवाज खूप मधूर असेल आणि खूप ज्ञानही असेल पण ते साधकांचे शोषण करतील जसं कोकिळा त्या सशाचे करत होती.
कलियुगात गरीब लोक श्रीमंतांसोबत राहतील.
श्रीमंताकडे खूप धन असेल ठेवायला जागा नसेल पण ते त्यातील एक कवडीसुद्धा गरीबांना देणार नाहीत जसं त्या विहिरींनी कोरड्या विहिरीला एक थेंबसुद्धा दिला नाही.
कलियुगात पालक मुलांवर एवढं प्रेम करतील की त्या प्रेमाने मुलं बिघडतील आणि त्यांचे आयुष्य उध्वस्त होईल जसं त्या गायीचे प्रेम वासराला त्रासदायक ठरले.
कलियुगात माणसे चारित्र्याच्या बाबतीत खूप घसरतील जसे ती शिळा डोंगरावरून घसरली आणि त्यांचे अधःपतन काही केल्या थांबणार नाही पण सर्वात शेवटी देवाचे नाम त्यांचे संरक्षण करील, त्यांचा उद्धार होईल जसं त्या लहान रोपाने त्या शिळेला आणखी खाली जाण्यापासुन रोखले."
🙏राम कृष्ण हरी🙏
"जसे कर्म, तसे फळ."
"कितीही विरोध होऊदेत, चांगल्या व योग्य गोष्टींनाच आपला पाठींबा द्या."
एकदा चार पांडव (युधिष्ठीर वगळता) भगवान श्रीकृष्णाला विचारतात- "कलियुग काय आहे आणि कलियुगात काय होईल?"
या प्रश्नावर कृष्ण हसला आणि म्हणाला,"कलियुगात काय परिस्थिती असेल त्याचे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो.
" असे म्हणून त्याने आपल्या भात्यातून चार बाण घेतले आणि धनुष्याच्या सहाय्याने चार वेगळ्या दिशेला सोडले आणि चारही पांडवांना ते बाण घेवून येण्याची आज्ञा दिली.
सर्व चारही पांडव बाणाच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने गेले.
जेव्हा अर्जुनाने बाण शोधून तो उचलला तेव्हा त्याला मंजुळ आवाज ऐकूआला तो त्या आवाजाकडे वळला त्याने पाहिले एक कोकिळा खूप गोड आवाजात गात आहे पण त्याचवेळी जिवंत सशाचे मांस खात आहे, तो ससा खूप वेदना सहन करत आहे.
या दैवी पक्षीचे हे घृणास्पद कृत्य पाहून अर्जुनाला धक्का बसला त्याने ते ठिकाण पटकन सोडले.
भीमाने ज्या ठिकाणाहून बाण उचलला त्या ठिकाणी पाच विहिरी होत्या.
एका विहरीभोवती चार विहीरी होत्या.
चार विहिरीतील गोड पाणी त्यांच्यात साठून राहू शकत नसल्याने त्या विहिरीबाहेर पडत आहे.
पण आश्चर्याची बाब म्हणजे या चारही विहीरी पूर्ण भरून वाहत असताना मात्र मधे असेलेली विहीर कोरडी होती.
हे पाहून भीम चक्रावून गेला.
नकूल जेव्हा बाण घेवून माघारी येत होता तेव्हा त्याने एक ठिकाणी पाहिले की एक गाय वासराला जन्म देत आहे.
जन्म दिलेल्या वासराला ती गाय चाटू लागली.
पण ते वासरू स्वच्छ झाले तरी गाय चाटतच राहते.
खूप मुश्किलीने लोक त्या वासराला गायीपासुन वेगळे करू शकले.
तेव्हा ते वासरू खूप जखमी झाले होते.
हे पाहून नकूल गोंधळून गेला.
सहदेवाने एका डोंगराजवळून बाण उचलला आणि पाहिले एक मोठ्ठी शिळा खाली कोसळत आली.
ती शिळा खाली येताना वाटेत येणाऱ्या मोठमोठ्या झाडांचा, दगडांचा चुराडा करत होती पण तीच शिळा एका लहान रोपामुळे थांबली.
यावेळी सहदेवही चकीत झाला.
या चौघांनी या सर्व घटनांचा अर्थ श्रीकृष्णाला विचारला.
श्रीकृष्ण हसला आणि अर्थ सांगितला.
"कलियुगात धर्मगुरूंचा आवाज खूप मधूर असेल आणि खूप ज्ञानही असेल पण ते साधकांचे शोषण करतील जसं कोकिळा त्या सशाचे करत होती.
कलियुगात गरीब लोक श्रीमंतांसोबत राहतील.
श्रीमंताकडे खूप धन असेल ठेवायला जागा नसेल पण ते त्यातील एक कवडीसुद्धा गरीबांना देणार नाहीत जसं त्या विहिरींनी कोरड्या विहिरीला एक थेंबसुद्धा दिला नाही.
कलियुगात पालक मुलांवर एवढं प्रेम करतील की त्या प्रेमाने मुलं बिघडतील आणि त्यांचे आयुष्य उध्वस्त होईल जसं त्या गायीचे प्रेम वासराला त्रासदायक ठरले.
कलियुगात माणसे चारित्र्याच्या बाबतीत खूप घसरतील जसे ती शिळा डोंगरावरून घसरली आणि त्यांचे अधःपतन काही केल्या थांबणार नाही पण सर्वात शेवटी देवाचे नाम त्यांचे संरक्षण करील, त्यांचा उद्धार होईल जसं त्या लहान रोपाने त्या शिळेला आणखी खाली जाण्यापासुन रोखले."
🙏राम कृष्ण हरी🙏
"जसे कर्म, तसे फळ."
"कितीही विरोध होऊदेत, चांगल्या व योग्य गोष्टींनाच आपला पाठींबा द्या."
Maitri or Friendship what goes wrong?
मैत्री तुटायला कधी सुरुवात होते..??
1) आपण मैत्री मध्ये व्यवहार आणतो तेव्हा..
2) मैत्रीमध्ये आपण खूप अपेक्षा ठेवायला सुरुवात करतो तेव्हा..
3) आपण मित्राला गृहीत धरायला सुरुवात करतो तेव्हा..
4) मैत्रीमध्ये आपणच कसे प्रामाणिक आहोत.. हे समोरच्याला सांगायला लागतो तेव्हा..
5) मित्र असे का वागला हे त्याला न विचारता.. आपणच मित्राच्या तसे वागण्यामागची कारणे शोधायला सुरुवात करतो तेव्हा..
6) आपण कसेही वागलो तरी मित्र आपल्याला समजून घेईल.. असे जेव्हा आपण समजायला लागतो तेव्हा..
7) मित्राने गमतीने बोललेल्या शब्दांचा अर्थ.. आपण आपल्या पद्धतीने घ्यायला सुरुवात करतो तेव्हा..
8) भांडण झाल्यावर पहिला फोन मित्रानेच केला पाहिजे.. असे आपण ठरवतो तेव्हा..
9) मित्र श्रीमंत झाल्यावर.. आपणच आपल्याला त्याच्या समोर गरीब समजायला लागतो तेव्हा..
10) आपला मित्र आता बदलत चालला आहे.. अशी आपली धारणा व्हायला लागते तेव्हा..
11) मित्र बिझी असेल.. त्यालाही त्याच्या अडचणी असतील.. हे आपण विसरायला लागतो तेव्हा..
12) आपल्या मित्राची आपण चार चौघात टर उडवायला सुरुवात करतो तेव्हा..
13) आपण जसा विचार करतो.. तशाच विचाराने मित्राने वागले पाहिजे.. असा दुराग्रह बनतो तेव्हा..
14) आपली चूक असतानाही मित्राने आपलीच बाजू कशी बरोबर आहे.. हे लोकांना सांगायला हवे.. अशी बावळट अपेक्षा आपण करायला लागतो तेव्हा..
15) खिशात पैसे असूनही जेवणाचे बिल भरताना आपला हात आपल्या पाकीटाकडे जात नाही तेव्हा..
16) कुठलातरी निकष लावत आपण आपल्या मित्राची इतरांबरोबर तुलना करायला लागतो तेव्हा..
17) आपले मित्रांशिवाय काही अडत नाही.. हे आपण नकळतमित्राला दर्शवायला लागतो तेव्हा..
18) आपल्या भल्यासाठी मित्राने सांगितलेल्या गोष्टी आपल्याला पकाऊ लेक्चर वाटायला लागते तेव्हा..
19) मित्र online दिसतोय पण आपल्या message ला reply देत नाही.. याचा अर्थ तो आपल्याला ignore करतोय.. असला सडका विचार आपल्या मनात येतो तेव्हा..
1) आपण मैत्री मध्ये व्यवहार आणतो तेव्हा..
2) मैत्रीमध्ये आपण खूप अपेक्षा ठेवायला सुरुवात करतो तेव्हा..
3) आपण मित्राला गृहीत धरायला सुरुवात करतो तेव्हा..
4) मैत्रीमध्ये आपणच कसे प्रामाणिक आहोत.. हे समोरच्याला सांगायला लागतो तेव्हा..
5) मित्र असे का वागला हे त्याला न विचारता.. आपणच मित्राच्या तसे वागण्यामागची कारणे शोधायला सुरुवात करतो तेव्हा..
6) आपण कसेही वागलो तरी मित्र आपल्याला समजून घेईल.. असे जेव्हा आपण समजायला लागतो तेव्हा..
7) मित्राने गमतीने बोललेल्या शब्दांचा अर्थ.. आपण आपल्या पद्धतीने घ्यायला सुरुवात करतो तेव्हा..
8) भांडण झाल्यावर पहिला फोन मित्रानेच केला पाहिजे.. असे आपण ठरवतो तेव्हा..
9) मित्र श्रीमंत झाल्यावर.. आपणच आपल्याला त्याच्या समोर गरीब समजायला लागतो तेव्हा..
10) आपला मित्र आता बदलत चालला आहे.. अशी आपली धारणा व्हायला लागते तेव्हा..
11) मित्र बिझी असेल.. त्यालाही त्याच्या अडचणी असतील.. हे आपण विसरायला लागतो तेव्हा..
12) आपल्या मित्राची आपण चार चौघात टर उडवायला सुरुवात करतो तेव्हा..
13) आपण जसा विचार करतो.. तशाच विचाराने मित्राने वागले पाहिजे.. असा दुराग्रह बनतो तेव्हा..
14) आपली चूक असतानाही मित्राने आपलीच बाजू कशी बरोबर आहे.. हे लोकांना सांगायला हवे.. अशी बावळट अपेक्षा आपण करायला लागतो तेव्हा..
15) खिशात पैसे असूनही जेवणाचे बिल भरताना आपला हात आपल्या पाकीटाकडे जात नाही तेव्हा..
16) कुठलातरी निकष लावत आपण आपल्या मित्राची इतरांबरोबर तुलना करायला लागतो तेव्हा..
17) आपले मित्रांशिवाय काही अडत नाही.. हे आपण नकळतमित्राला दर्शवायला लागतो तेव्हा..
18) आपल्या भल्यासाठी मित्राने सांगितलेल्या गोष्टी आपल्याला पकाऊ लेक्चर वाटायला लागते तेव्हा..
19) मित्र online दिसतोय पण आपल्या message ला reply देत नाही.. याचा अर्थ तो आपल्याला ignore करतोय.. असला सडका विचार आपल्या मनात येतो तेव्हा..
Tuesday, December 13, 2016
Saint Gnyaneshwar - Suvichar
ज्ञानेश्वर महाराजांना वाळीत टाकले तेव्हा त्यांच्या मनात आलेले विचार : -
१) माझा जन्म कोठे व्हावा,कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत, हे माझ्या हाती नव्हते, त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो.
--------- संत ज्ञानेश्वर🌹
२) मी स्त्री व्हावे की पुरूष, काळा की गोरा, माझ्या शरिराची ठेवण, सर्व अवयव ठिकठाक असणे, हे देखील माझ्या हाती नव्हते. मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे, योग्य ती काळजी घेणे, हे माझ्या हाती आहे.
--------- संत ज्ञानेश्वर🌹
३) माझ्या आई वडिलांची सांपत्तिक स्थिती, सामाजिक स्थान, त्यांचा स्वभाव, हे देखील माझ्या हाती नव्हते. त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे.
--------संत ज्ञानेश्वर🌹
४) सगळ्यांनाच सगळी सुखं मिळत नाहीत. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दु:खं असणारच आहेत. ती दु:खं कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही. त्यामुळे माझ्या दु:खांचे भांडवल न करता, मी त्या दु:खांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन.
--------- संत ज्ञानेश्वर🌹
५) माझ्या आसपास असलेल्या लोकांनी, माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी, माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे माझ्या हाती नसले, तरी मी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे. संयम, मृदु भाषा, मंगल कामना हे माझ्या हाती आहे.
--------- संत ज्ञानेश्वर 🌹
६) माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते. मात्र त्या वेळी सकारात्मक विचार अन् योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे.
--------- संत ज्ञानेश्वर 🌹
७) हे विश्व मी निर्माण केलेले नाही. किंवा हे विश्व कसे असले पाहिजे, या माझ्या मताला देखील काही किंमत नाही. तेव्हा, हे असे का? ते तसे का? असे का नाही? वगैरे प्रश्न विचारत राहून वैतागण्या ऎवजी, जे चूक आहे, अयोग्य आहे, ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल. हे ही नसे थोडके !
--------- संत ज्ञानेश्वर 🌹
८) कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दु:ख मिळणार आहे याची जाणीव ठेवून, मी माझ्या आसपासच्या दु:खी माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे.
--------- संत ज्ञानेश्वर 🌹
९) आज जरी यश, सुख, समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली, तरी उद्या अथवा केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेवून, मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे,
--------- संत ज्ञानेश्वर🌹
१०) मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दु:ख करत रहाण्या ऐवजी, जे काही मिळाले आहे, त्या बाबत मी आभारी असले पाहिजे. जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल, तेव्हा ती संधीb मी गमावता कामा नये.
--------- संत ज्ञानेश्वर
१) माझा जन्म कोठे व्हावा,कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत, हे माझ्या हाती नव्हते, त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो.
--------- संत ज्ञानेश्वर🌹
२) मी स्त्री व्हावे की पुरूष, काळा की गोरा, माझ्या शरिराची ठेवण, सर्व अवयव ठिकठाक असणे, हे देखील माझ्या हाती नव्हते. मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे, योग्य ती काळजी घेणे, हे माझ्या हाती आहे.
--------- संत ज्ञानेश्वर🌹
३) माझ्या आई वडिलांची सांपत्तिक स्थिती, सामाजिक स्थान, त्यांचा स्वभाव, हे देखील माझ्या हाती नव्हते. त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे.
--------संत ज्ञानेश्वर🌹
४) सगळ्यांनाच सगळी सुखं मिळत नाहीत. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दु:खं असणारच आहेत. ती दु:खं कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही. त्यामुळे माझ्या दु:खांचे भांडवल न करता, मी त्या दु:खांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन.
--------- संत ज्ञानेश्वर🌹
५) माझ्या आसपास असलेल्या लोकांनी, माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी, माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे माझ्या हाती नसले, तरी मी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे. संयम, मृदु भाषा, मंगल कामना हे माझ्या हाती आहे.
--------- संत ज्ञानेश्वर 🌹
६) माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते. मात्र त्या वेळी सकारात्मक विचार अन् योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे.
--------- संत ज्ञानेश्वर 🌹
७) हे विश्व मी निर्माण केलेले नाही. किंवा हे विश्व कसे असले पाहिजे, या माझ्या मताला देखील काही किंमत नाही. तेव्हा, हे असे का? ते तसे का? असे का नाही? वगैरे प्रश्न विचारत राहून वैतागण्या ऎवजी, जे चूक आहे, अयोग्य आहे, ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल. हे ही नसे थोडके !
--------- संत ज्ञानेश्वर 🌹
८) कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दु:ख मिळणार आहे याची जाणीव ठेवून, मी माझ्या आसपासच्या दु:खी माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे.
--------- संत ज्ञानेश्वर 🌹
९) आज जरी यश, सुख, समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली, तरी उद्या अथवा केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेवून, मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे,
--------- संत ज्ञानेश्वर🌹
१०) मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दु:ख करत रहाण्या ऐवजी, जे काही मिळाले आहे, त्या बाबत मी आभारी असले पाहिजे. जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल, तेव्हा ती संधीb मी गमावता कामा नये.
--------- संत ज्ञानेश्वर
Labels:
marathi,
marathi quotes,
marathi short story,
marathi suvichar,
quotes
Monday, December 12, 2016
Marathi Suvichar - Swabhawala Aushadh
[9:42 PM, 12/9/2016] Aai Borivali: 

🇮

स्वभावाला औषध असतं,
पण ते रोज घ्यायच असतं..॥
अधिरातला 'अ' सोडून,
थोडं धिरानं घ्यायच असतं ॥
संतापातला 'ताप' सोडून,
मनाला संत करायच असतं ॥
मनातला हट्ट सोडून,
नात घट्ट करायच असतं॥
माझ्यातला मी सोडून,
तिच्यातला 'ती'ला जपायच असतं ॥
आपलं बोलणं सोडून कधी,
समोरच्याचही ऐकायच असतं ॥
एकाच दिवशी नाही तरी,
हळू हळू बदलायचं असतं ॥
थोडं थोडं का होईना,
रोज प्रेम मात्र द्यायच असतं ॥
एकाचा राग दुसऱ्यावर न काढता,
समोरच्याला समजून घ्यायचं असतं ||
स्वभावाला औषध असतं,
फक्त ते रोज घ्यायच असतं !!
शुभ सकाळ







9:42
Sanjay Upadhye Short Poem - thoughts
सारसबागेत गणपतीला
घातला जेव्हा स्वेटर
फुटपाथवरचा ग़रीब म्हणे
मी काय मारले खेटर
बाप्पा तुझा जन्म मुळचा
बर्फामध्येच झाला
तरीसुद्धा भक्ताला त्या
तुझा पुळका आला
ठाऊक आहे मला
की माझं नशिब खोटं
नि स्वेटर घालणा-याचं पोट
तुझ्यासारखंच मोठं
मला वाटलं होत तुला
थंडी वाजत नाही
नि माझ्या भिका-याच्या भांड्यात
नाणं वाजत नाही
नोटाबंदीमुळे आता
नाणं सुद्धा मोठं
नि भीक देणा-याचं मन
झालं की रे छोटं
तुझ्यासाठी नेपाळ्याचा
स्वेटर विकला गेला
नि त्याच फुटपाथवरती
माझी जीव गारठून मेला
ज्याने तुला स्वेटर घातला
त्याचे करशील ना रे भले
माझ्या सारखे किती तरी
जरी गेले मेले
तुझी भक्ती म्हणजे काय
ती कधीच कळली नाही
आजवरती तुझी माझी
वीणच जुळली नाही
घरात स्वेटर घालुन संजय
रचेल यांवर काव्य
नि सोशल मिडियावर त्याचे
कौतुक होईल भव्य
मला याची सवय आहे
मी असाच जगतो आहे
नि अंगावरती उन्हं यायची
वाट बघतो आहे
डाॅ. संजय उपाध्ये
घातला जेव्हा स्वेटर
फुटपाथवरचा ग़रीब म्हणे
मी काय मारले खेटर
बाप्पा तुझा जन्म मुळचा
बर्फामध्येच झाला
तरीसुद्धा भक्ताला त्या
तुझा पुळका आला
ठाऊक आहे मला
की माझं नशिब खोटं
नि स्वेटर घालणा-याचं पोट
तुझ्यासारखंच मोठं
मला वाटलं होत तुला
थंडी वाजत नाही
नि माझ्या भिका-याच्या भांड्यात
नाणं वाजत नाही
नोटाबंदीमुळे आता
नाणं सुद्धा मोठं
नि भीक देणा-याचं मन
झालं की रे छोटं
तुझ्यासाठी नेपाळ्याचा
स्वेटर विकला गेला
नि त्याच फुटपाथवरती
माझी जीव गारठून मेला
ज्याने तुला स्वेटर घातला
त्याचे करशील ना रे भले
माझ्या सारखे किती तरी
जरी गेले मेले
तुझी भक्ती म्हणजे काय
ती कधीच कळली नाही
आजवरती तुझी माझी
वीणच जुळली नाही
घरात स्वेटर घालुन संजय
रचेल यांवर काव्य
नि सोशल मिडियावर त्याचे
कौतुक होईल भव्य
मला याची सवय आहे
मी असाच जगतो आहे
नि अंगावरती उन्हं यायची
वाट बघतो आहे
डाॅ. संजय उपाध्ये
Marathi Short Story
ऑफीस सुटल्यावर घरी निघालो , खूप भूक लागली होती. पण आई व बायको दोघींही घरी नव्हत्या म्हणून रस्त्यात पाणी पुरीची गाडी दिसली म्हणून पाणीपुरी खाण्यासाठी थांबलो. पाणीपुरीवाल्याकडे गर्दी होती. गपचूप आपला नंबर येईपर्यंत वाट बघण्यापालिकडे काही हातात नव्हते.
पाणीपुरीवालाच्या बाजूला एक आजोबा त्यांचा नंबर यायची वाट बघत उभे होते. पायात पांढरा शुभ्र पायजमा, वर हाफ शर्ट, चेहऱ्यावर निर्विकार भाव, आणि हसरा चेहरा, वय वर्ष साधारण ६५-७०.
आजोबा मस्त पाणीपुरी च्या पिशवीत हात घालून एक एक कोरडी पुरी तोडांत कोंबत होते. माझा नंबर आला. पाणीपुरीवाल्यासमोर द्रोण हातात घेऊन उभा राहिलो. व एकामागोमाग एक पाच पाणीपुऱ्या खाल्ल्या. पोटातली आग जरा शांत झाली होती. आजोबांचा मात्र पुऱ्या खाण्याचा कार्यक्रम चालूच होता. पाणीपुरीवाला चांगलाच वैतागला होता.
"बाबूजी प्लेट देता हुँ। बराबरसे खाओ ना" आजोबांनी नुसतेच गालातल्या गालात हसून पुऱ्या खाणे चालूच ठेवले.
एक प्लेट पाणीपुरी खाऊन माझे तोंड खवळले होते. म्हणून आजून एक पाणीपुरीची प्लेट सुरु केली.
आजोबा मात्र तल्लीन होऊन पिशवीमधल्या पुऱ्या मटकावत होते.
"ओ आजोबा नीट घेऊन खा की?" मी बोललो. आजोबा हू नाही की चू नाही. वाटले काहीतरी गडबड आहे. माझी दुसरी प्लेट संपत आली. आजोबा तिथेच उभे.
तेवढ्यात मागून एक माणूस स्कुटीवर आला.
"काळजी करू नकोस, बाबा सापडले!!" कोणाशी तरी मोबाईलवर बोलत होता. गळ्यात ऑफिस बॅग, पायात साधी चप्पल, चाळीशीतला असावा तो, आणि त्याच्या चेहऱ्यावर त्याचे बाबा सापडल्याचा आनंद दिसत होता.!
त्याने गाडी बाजूला घेवून स्टँडला लावली.
"काय बाबा आज पाणीपूरी का? खायची का अजून???"
त्याने आजोबांना विचारले. आजोबांचे त्यावर काहीच उत्तर नाही. त्याने आजोबांना गाडीवर बसवले. व पाणीपुरीवाल्याला नम्रपणे विचारले की, आजोबांनी किती पुऱ्या खाल्ल्या आणि त्याचे पैसे देऊन टाकले. हे सगळे बघून मला नवलच वाटले.
"हे आजोबा कोण आहेत तुमचे?" मी विचारले.
"वडील आहेत माझे." त्याचे उत्तर.
"त्यांना काही त्रास आहे का?" माझा पुढचा प्रश्न.
"हो त्यांना अल्झायमर आहे."
अत्यंत शांतपणे त्याने सांगितले. त्याच्या बोलण्यात कुठेही दुःख, ताण, त्रास नव्हता. अगदी सहजतेने तो बोलत होता.
" मग हे आजोबा असे कुठेही जातात का?"
" हो, आत्ताच बघा ना, पाच किलोमीटर चालत आलेत."
मी शॉकच झालो.
"मग तुम्ही यांना शोधता कसे?"मी विचारले.
"आम्ही यांच्या खिशामध्ये कायम एक मोबाईल ठेवतो आणि त्यात एक GPS ट्रॅकर लावला आहे. त्याच्या साहाय्याने शोधतो ह्यांना मी."
"असे वारंवार होत असेल" मी आश्चर्याने विचारले.
तो स्मितहास्य करून म्हणाला "महिन्याला एक दोन वेळेस"
"काळजी घ्याआजोबांची! बाप रे काय हा वैताग" मी बोललो. त्यावर तो गृहस्थ म्हणाला, "बाबाही मी लहानपणी खेळायला गेलो की मला शोधून आणायचे ,याञेत हरवलो तर शोध शोध शोधायचे. त्यात काय येवढं."
त्याने त्याच्या वडिलांना व्यवस्थित गाडीवर बसविले आणि निघून गेला.
खूप काही शिकण्यासारख होतं त्या माणसाकडून. इतका दुर्दम्य आजार वडिलांना असून सुद्धा किती शांत होता तो. बिलकुल चिडचिड नाही की कुठल्याच प्रकारचा मनस्ताप नाही.
उतारवयात आपल्या वडिलांना लहान बाळाप्रमाणे सांभाळणाऱ्या त्या माणसाला मनोमन सलाम ठोकून मी पुढे निघालो...
खरंच आपल्यालाही जगता येईल का हो असं.!!
वरील संदेश माझ्या कडे एका शाळकरी मित्राने पाठवला, मला आवडला म्हणून आपल्याला पाठवला आहे.
पाणीपुरीवालाच्या बाजूला एक आजोबा त्यांचा नंबर यायची वाट बघत उभे होते. पायात पांढरा शुभ्र पायजमा, वर हाफ शर्ट, चेहऱ्यावर निर्विकार भाव, आणि हसरा चेहरा, वय वर्ष साधारण ६५-७०.
आजोबा मस्त पाणीपुरी च्या पिशवीत हात घालून एक एक कोरडी पुरी तोडांत कोंबत होते. माझा नंबर आला. पाणीपुरीवाल्यासमोर द्रोण हातात घेऊन उभा राहिलो. व एकामागोमाग एक पाच पाणीपुऱ्या खाल्ल्या. पोटातली आग जरा शांत झाली होती. आजोबांचा मात्र पुऱ्या खाण्याचा कार्यक्रम चालूच होता. पाणीपुरीवाला चांगलाच वैतागला होता.
"बाबूजी प्लेट देता हुँ। बराबरसे खाओ ना" आजोबांनी नुसतेच गालातल्या गालात हसून पुऱ्या खाणे चालूच ठेवले.
एक प्लेट पाणीपुरी खाऊन माझे तोंड खवळले होते. म्हणून आजून एक पाणीपुरीची प्लेट सुरु केली.
आजोबा मात्र तल्लीन होऊन पिशवीमधल्या पुऱ्या मटकावत होते.
"ओ आजोबा नीट घेऊन खा की?" मी बोललो. आजोबा हू नाही की चू नाही. वाटले काहीतरी गडबड आहे. माझी दुसरी प्लेट संपत आली. आजोबा तिथेच उभे.
तेवढ्यात मागून एक माणूस स्कुटीवर आला.
"काळजी करू नकोस, बाबा सापडले!!" कोणाशी तरी मोबाईलवर बोलत होता. गळ्यात ऑफिस बॅग, पायात साधी चप्पल, चाळीशीतला असावा तो, आणि त्याच्या चेहऱ्यावर त्याचे बाबा सापडल्याचा आनंद दिसत होता.!
त्याने गाडी बाजूला घेवून स्टँडला लावली.
"काय बाबा आज पाणीपूरी का? खायची का अजून???"
त्याने आजोबांना विचारले. आजोबांचे त्यावर काहीच उत्तर नाही. त्याने आजोबांना गाडीवर बसवले. व पाणीपुरीवाल्याला नम्रपणे विचारले की, आजोबांनी किती पुऱ्या खाल्ल्या आणि त्याचे पैसे देऊन टाकले. हे सगळे बघून मला नवलच वाटले.
"हे आजोबा कोण आहेत तुमचे?" मी विचारले.
"वडील आहेत माझे." त्याचे उत्तर.
"त्यांना काही त्रास आहे का?" माझा पुढचा प्रश्न.
"हो त्यांना अल्झायमर आहे."
अत्यंत शांतपणे त्याने सांगितले. त्याच्या बोलण्यात कुठेही दुःख, ताण, त्रास नव्हता. अगदी सहजतेने तो बोलत होता.
" मग हे आजोबा असे कुठेही जातात का?"
" हो, आत्ताच बघा ना, पाच किलोमीटर चालत आलेत."
मी शॉकच झालो.
"मग तुम्ही यांना शोधता कसे?"मी विचारले.
"आम्ही यांच्या खिशामध्ये कायम एक मोबाईल ठेवतो आणि त्यात एक GPS ट्रॅकर लावला आहे. त्याच्या साहाय्याने शोधतो ह्यांना मी."
"असे वारंवार होत असेल" मी आश्चर्याने विचारले.
तो स्मितहास्य करून म्हणाला "महिन्याला एक दोन वेळेस"
"काळजी घ्याआजोबांची! बाप रे काय हा वैताग" मी बोललो. त्यावर तो गृहस्थ म्हणाला, "बाबाही मी लहानपणी खेळायला गेलो की मला शोधून आणायचे ,याञेत हरवलो तर शोध शोध शोधायचे. त्यात काय येवढं."
त्याने त्याच्या वडिलांना व्यवस्थित गाडीवर बसविले आणि निघून गेला.
खूप काही शिकण्यासारख होतं त्या माणसाकडून. इतका दुर्दम्य आजार वडिलांना असून सुद्धा किती शांत होता तो. बिलकुल चिडचिड नाही की कुठल्याच प्रकारचा मनस्ताप नाही.
उतारवयात आपल्या वडिलांना लहान बाळाप्रमाणे सांभाळणाऱ्या त्या माणसाला मनोमन सलाम ठोकून मी पुढे निघालो...
खरंच आपल्यालाही जगता येईल का हो असं.!!
वरील संदेश माझ्या कडे एका शाळकरी मित्राने पाठवला, मला आवडला म्हणून आपल्याला पाठवला आहे.
Dutta Jayanti thoughts - Marathi
🌹 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹
🌹दत्त जयंतीच्या शुभेच्छा🌹
🌹 दत्ताची नावे आणि त्यांचा अर्थ🌹
🚩१] दत्त : दत्त म्हणजे ‘आपण आत्मा आहोत’
याची अनुभूती देणारा. प्रत्येकात आत्मा आहे; म्हणून प्रत्येक
जण चालतो, बोलतो आणि हसतो. यावरून ‘आपल्यात देव
आहे’, हेच सत्य आहे. त्याच्या विना आपले अस्तित्वच नाही.
आपल्याला याची जाणीव झाली, तर आपण
प्रत्येकाशी प्रेमानेच वागू. या दत्त जयंतीला ही जाणीव
जागृत करण्याचा आपण निश्चय करूया....
🚩२] अवधूत : जो अहं धुतो, तो अवधूत ! अभ्यास
करतांना आपल्या मनावर ताण येतो ना ? खरेतर अभ्यास
करण्यासाठी बुद्धी आणि शक्ती देणारा देवच आहे. पण
‘अभ्यास करणारा मी आहे’, असे वाटल्याने ताण येतो. हाच
आपला अहंकार आहे. दत्त जयंतीला आपण प्रार्थना करूया, ‘हे
दत्तात्रेया, माझ्यातील अहं नष्ट
करण्याची शक्ती आणि बुद्धी तूच मला दे....’
🚩३] दिगंबर : दिक् म्हणजे दिशा हेच ज्याचे अंबर, म्हणजे वस्त्र आहे
असा ! जो सर्व व्यापी आहे, ज्याने सर्व
दिशा व्यापल्या आहेत, तो दिगंबर ! जर
ही देवता मोठी आहे, तर आपल्या सारख्या सामान्य
जिवांनी त्याला शरणच जायला हवे. तसे केल्यासच
आपल्यावर त्याची कृपा होईल .
🙏 ॐ जय गुरुदेव दत्त 🙏
🌼🌷🌼🌷🌼🌷🌼
दत्ताच्या परिवाराचा भावार्थ
🚩४] गाय : दत्ताच्या मागे असलेली गाय
ही पृथ्वी आणि कामधेनू यांचे प्रतीक आहे. कामधेनू
आपणाला जे हवे, ते सर्व देते.
पृथ्वी आणि गायही आपल्याला सर्व काही देतात.…
🚩५] ४ कुत्रे : हे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या ४
वेदांचे प्रतीक आहेत.…
🚩६] औदुंबर वृक्ष : दत्ताचे पूजनीय रूप ! या वृक्षात दत्त तत्त्व
अधिक आहे.…
🚩७] मूर्तीविज्ञान:
दत्ताच्या मूर्तीतील वस्तूंचा भावार्थ पुढील प्रमाणे
आहे
🚩८] कमंडलू आणि जपमाळ : हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे.…
🚩९] शंख आणि चक्र : श्री विष्णूचे प्रतीक आहे.…
🚩१०] त्रिशूळ आणि डमरू : शंकराचे प्रतीक आहे.…
🚩११] झोळी : ही अहं नष्ट झाल्याचे प्रतीक आहे. झोळी घेऊन
दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं नष्ट होतो.
💐💐💐🌼🌼💐💐💐
🌹दत्त जयंतीच्या शुभेच्छा🌹
🌹 दत्ताची नावे आणि त्यांचा अर्थ🌹
🚩१] दत्त : दत्त म्हणजे ‘आपण आत्मा आहोत’
याची अनुभूती देणारा. प्रत्येकात आत्मा आहे; म्हणून प्रत्येक
जण चालतो, बोलतो आणि हसतो. यावरून ‘आपल्यात देव
आहे’, हेच सत्य आहे. त्याच्या विना आपले अस्तित्वच नाही.
आपल्याला याची जाणीव झाली, तर आपण
प्रत्येकाशी प्रेमानेच वागू. या दत्त जयंतीला ही जाणीव
जागृत करण्याचा आपण निश्चय करूया....
🚩२] अवधूत : जो अहं धुतो, तो अवधूत ! अभ्यास
करतांना आपल्या मनावर ताण येतो ना ? खरेतर अभ्यास
करण्यासाठी बुद्धी आणि शक्ती देणारा देवच आहे. पण
‘अभ्यास करणारा मी आहे’, असे वाटल्याने ताण येतो. हाच
आपला अहंकार आहे. दत्त जयंतीला आपण प्रार्थना करूया, ‘हे
दत्तात्रेया, माझ्यातील अहं नष्ट
करण्याची शक्ती आणि बुद्धी तूच मला दे....’
🚩३] दिगंबर : दिक् म्हणजे दिशा हेच ज्याचे अंबर, म्हणजे वस्त्र आहे
असा ! जो सर्व व्यापी आहे, ज्याने सर्व
दिशा व्यापल्या आहेत, तो दिगंबर ! जर
ही देवता मोठी आहे, तर आपल्या सारख्या सामान्य
जिवांनी त्याला शरणच जायला हवे. तसे केल्यासच
आपल्यावर त्याची कृपा होईल .
🙏 ॐ जय गुरुदेव दत्त 🙏
🌼🌷🌼🌷🌼🌷🌼
दत्ताच्या परिवाराचा भावार्थ
🚩४] गाय : दत्ताच्या मागे असलेली गाय
ही पृथ्वी आणि कामधेनू यांचे प्रतीक आहे. कामधेनू
आपणाला जे हवे, ते सर्व देते.
पृथ्वी आणि गायही आपल्याला सर्व काही देतात.…
🚩५] ४ कुत्रे : हे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या ४
वेदांचे प्रतीक आहेत.…
🚩६] औदुंबर वृक्ष : दत्ताचे पूजनीय रूप ! या वृक्षात दत्त तत्त्व
अधिक आहे.…
🚩७] मूर्तीविज्ञान:
दत्ताच्या मूर्तीतील वस्तूंचा भावार्थ पुढील प्रमाणे
आहे
🚩८] कमंडलू आणि जपमाळ : हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे.…
🚩९] शंख आणि चक्र : श्री विष्णूचे प्रतीक आहे.…
🚩१०] त्रिशूळ आणि डमरू : शंकराचे प्रतीक आहे.…
🚩११] झोळी : ही अहं नष्ट झाल्याचे प्रतीक आहे. झोळी घेऊन
दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं नष्ट होतो.
💐💐💐🌼🌼💐💐💐
Dutta Jayanti sayings Marathi
सकल पालनहारा..
भक्त वत्सल सुखकरा..
अनुसया पुत्रा..
ब्रह्मा विष्णु महेश्वरा..!!
नाथांच्या नाथा..
सिद्ध समर्थ शुभंकारा..
नमितो तुज देवा..
शरण आलो कृपा करा..!!
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
भक्त वत्सल सुखकरा..
अनुसया पुत्रा..
ब्रह्मा विष्णु महेश्वरा..!!
नाथांच्या नाथा..
सिद्ध समर्थ शुभंकारा..
नमितो तुज देवा..
शरण आलो कृपा करा..!!
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
Friday, July 10, 2015
Marathi kavita: Bayko
बायको.....!
बायको नसेल तेव्हा
घराला त्राण नसतो..!
बायको हाच खरा
घराचा प्राण असतो..!!
तिचे अस्तित्व हवे असते
सकारात्मक खलबतांसाठी..!
बायको म्हणजे बंदर असते
नवरा नावाच्या गलबतासाठी..!!
संसारातील जिवनसाथीसाठी
शोधाशोध नात्यांच्या डेऱ्यांसवे..!
बायको नावाचा शाश्वत आधार
मिळतो सप्तपदीच्या फेऱ्यांसवे..!!
सर्वांच्या आनंदासाठी
ती साथ देणारी सावली असते..!
दुखऱ्या क्षणी सावरायला
बायको नावाची माउली असते..!!
गंध सुखाचा अनुभवणारा
घरात सर्वांचा ताफा असतो..!
कुटुंबात दरवळणारा
बायको नावाचा चाफा असतो..!!
कर्तव्याच्या करारावरची
ती न पुसणारी शाई असते..!
प्रत्येकाची आवड जपणारी
बायको नावाची घाई असते..!!
आजारपणात फणफणणाऱ्या
ती लेकरांसाठी धट्टी असते..!
कपाळावरील मिठाची
बायको नावाची पट्टी असते..!!
स्वयंपाक, धुणे,दळणकांडप
तिचे राब-राबणारे हात असतात..!
प्रसंगी शिळेपाके चावणारे
बायको नावाचे दात असतात..!!
सर्व दुःखांना स्वतःमध्ये
ती मळणारी उंडी असते..!
जन्म दिलेल्या फुलझाडांसाठी
बायको नावाची कुंडी असते..!!
बायको नसेल तेव्हा
घराला त्राण नसतो..!
बायको हाच खरा
घराचा प्राण असतो..!!
Labels:
choti kavita,
husbands-wives,
joke,
kavita,
marathi,
marathi article
Thursday, July 9, 2015
About Husbands
जरा बऱ नसेल तर नवरे
कित्ती मदत करतात,
तु झोप आता म्हणून
दहा वेळा उठवतात.
चहा कशात आहे,
साखर संपलीये का,
गाळणं कुठाय?
सगळे डब्बे ओट्यावरच
मुक्कामाला येतात.
जरा बरं नसेल तर
नवरे कित्ती मदत करतात
टेबलावरची वर्तुळ सांगतात
किती झालाय चहा,
आवरणारे म्हणतात
तू झोपुनच रहा,
फडके म्हणुन नवाकोरा
नॅपकीन ही घेतात.
जरा बऱ नसेल तर
नवरे कित्ती मदत करतात
दुध जातंच ऊतु
जरी केलं 'वर्क फ्रॉम होम'
आणि ऑफिसला गेले तर
फोन वर फोन.
चौकशीच्या नादात
बायकोची झोप विसरतात.
जरा बरं नसेल तर
नवरे कित्ती मदत करतात
खरकटी भांडी आणि
पिम्पाखाली तळे,
कुकरच्या अगणित शिट्या
आणि पोळी भाजीची पार्सले.
यांच्या दर्शनानेच बहुदा
आजारपणे पळतात.
जरा बरं नसेल तर
नवरे कित्ती मदत करतात
रागावू नका, एखादा नवरा
असेलही जगावेगळा.
सन्माननीय अपवादांनी
स्वतःला वगळा.
पण असे नवरे नेहमी दुसऱ्या बायकांनाच मिळतात
कि पलीकडचे रंग
जरा जास्तच हिरवे दिसतात.
म्हणे नवरे मदत करतात??
कित्ती मदत करतात,
तु झोप आता म्हणून
दहा वेळा उठवतात.
चहा कशात आहे,
साखर संपलीये का,
गाळणं कुठाय?
सगळे डब्बे ओट्यावरच
मुक्कामाला येतात.
जरा बरं नसेल तर
नवरे कित्ती मदत करतात
टेबलावरची वर्तुळ सांगतात
किती झालाय चहा,
आवरणारे म्हणतात
तू झोपुनच रहा,
फडके म्हणुन नवाकोरा
नॅपकीन ही घेतात.
जरा बऱ नसेल तर
नवरे कित्ती मदत करतात
दुध जातंच ऊतु
जरी केलं 'वर्क फ्रॉम होम'
आणि ऑफिसला गेले तर
फोन वर फोन.
चौकशीच्या नादात
बायकोची झोप विसरतात.
जरा बरं नसेल तर
नवरे कित्ती मदत करतात
खरकटी भांडी आणि
पिम्पाखाली तळे,
कुकरच्या अगणित शिट्या
आणि पोळी भाजीची पार्सले.
यांच्या दर्शनानेच बहुदा
आजारपणे पळतात.
जरा बरं नसेल तर
नवरे कित्ती मदत करतात
रागावू नका, एखादा नवरा
असेलही जगावेगळा.
सन्माननीय अपवादांनी
स्वतःला वगळा.
पण असे नवरे नेहमी दुसऱ्या बायकांनाच मिळतात
कि पलीकडचे रंग
जरा जास्तच हिरवे दिसतात.
म्हणे नवरे मदत करतात??
Labels:
choti kavita,
husbands-wives,
joke,
kavita,
marathi,
marathi article
Wednesday, July 8, 2015
Shala aani college
शाळा : म्हणजे गणवेश, नीटनेटकेपणा.....
काॅलेज : म्हणजे कसाही अवतार
आणि स्टाईल.....

शाळा : पेन्सिल, रबर, शार्पनर, पेन,
पट्टी.....
काॅलेज : एक बॉलपेन तो पण
मित्राकडून घेतलेला......

शाळा : वर्गात येण्याआधी "टीचर, मे आय कम इन..?" किंवा "टीचर, मी आत येवू का...?"
काॅलेज : वर्गाजवळ येणार, किती बसलेत ते बघणार आणि मोबाईल कानाला लावून परत जाणार.

शाळा : सर्व विषयांची पुस्तक
आणि वह्या स्वतःजवळ ठेवणार...!
काॅलेज : मित्राला बोलणार "अरे यार एक पेज तर दे ना".

शाळा : पेपर लवकर देवून निघाला तर सर्व बोलणार, काय स्कॉलर आहे हा यार.
काॅलेज : फ्रेंड्स बोलणार "काही येत
नाही त्याला म्हणून निघालाय".
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
शाळा : उशिरा आले कि शेवटच्या बाकावर बसावे लागते.
काॅलेज : उशिरा आले कि पहिल्या बाकावर बसावे लागते.
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
शाळा : म्हणजे व्यवस्थित पाठांतर.
काॅलेज : म्हणजे नुसता रट्टा.
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
शाळा : म्हणजे मजा, मस्ती, धमाल.
काॅलेज : म्हणजे जस्ट चिल यार.
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
शाळा : यार, मला ती आवडते.
काॅलेज : सांभाळून बघ रे वहिनी आहे........
miss you my all sweet friends
Monday, November 4, 2013
Ayushya - Chaar oli
Yevdhyasha Aayushyat khuuup kahi hava asata,
Pan je hava asata tech milat nasta,
Hava te milala tari khuuup kahi kami asata.....
Chandanyani bharun suddha aapala aabhal matra rikamch asata....
Pan je hava asata tech milat nasta,
Hava te milala tari khuuup kahi kami asata.....
Chandanyani bharun suddha aapala aabhal matra rikamch asata....
![]() |
Ayushya Kawita - marathi wallpaper - Click on the image for larger size and to download |
Labels:
char oli,
kawita,
life,
marathi,
marathi kawita,
marathi poem,
marathi wallpapers,
marthi wallpapers,
nice words,
philosophy,
vichar
Chatrapati mhanaje
छत्रपति म्हणजे
जिजाउच्यां गळ्यातली मोत्याची माळ.........
छत्रपति म्हणजे
सईचं कुकंवान भरलेल कपाळ.........
छत्रपति म्हणजे
बलीदानी पुत्र ज्याचा शभुंबाळ.........
छत्रपति म्हणजे
तुकोबारायाच्यां अभंगातला टाळ.........
छत्रपति म्हणजे
सोन्याच्या नागराला चादींचा फाळ.........
छत्रपति म्हणजे
कायम अठवणीतले आभाळ.........
छत्रपति म्हणजे
कतृत्वच्या सरीने हिरवा झालेला रानमाळ.........
छत्रपति म्हणजे
ज्यान भारतमातेच्या पायात बाधंली सोन्याची चाळ.........
छत्रपति म्हणजे
गनिमासाठी तुफाणी जजांळ.........
छत्रपति म्हणजे
ज्याच्यापुढ शीजली नाही मुगलाचीं डाळ.........
छत्रपति म्हणजे
ज्यान स्वर्गात जाउन बाधंला सोन्याचा सात मजली ताळ.........
छत्रपति म्हणजे
औरगंजेबाला स्वप्नात् भासलेला महाकाळ.........
छत्रपति म्हणजे
भगव्या स्वराज्याचा सुवर्णकाळ.........
छत्रपति म्हणजे
येणा-या प्रत्येक पीढीचा भविष्यकाळ.........
छत्रपति म्हणजे
परक्रमाच्या काळजातला जाळ.........
छत्रपति म्हणजे
अन्यायाचा कर्दनकाळ.......
जय जिजाउ....!!
जय शिवराय....!!
जय शभुंराजे....
जिजाउच्यां गळ्यातली मोत्याची माळ.........
छत्रपति म्हणजे
सईचं कुकंवान भरलेल कपाळ.........
छत्रपति म्हणजे
बलीदानी पुत्र ज्याचा शभुंबाळ.........
छत्रपति म्हणजे
तुकोबारायाच्यां अभंगातला टाळ.........
छत्रपति म्हणजे
सोन्याच्या नागराला चादींचा फाळ.........
छत्रपति म्हणजे
कायम अठवणीतले आभाळ.........
छत्रपति म्हणजे
कतृत्वच्या सरीने हिरवा झालेला रानमाळ.........
छत्रपति म्हणजे
ज्यान भारतमातेच्या पायात बाधंली सोन्याची चाळ.........
छत्रपति म्हणजे
गनिमासाठी तुफाणी जजांळ.........
छत्रपति म्हणजे
ज्याच्यापुढ शीजली नाही मुगलाचीं डाळ.........
छत्रपति म्हणजे
ज्यान स्वर्गात जाउन बाधंला सोन्याचा सात मजली ताळ.........
छत्रपति म्हणजे
औरगंजेबाला स्वप्नात् भासलेला महाकाळ.........
छत्रपति म्हणजे
भगव्या स्वराज्याचा सुवर्णकाळ.........
छत्रपति म्हणजे
येणा-या प्रत्येक पीढीचा भविष्यकाळ.........
छत्रपति म्हणजे
परक्रमाच्या काळजातला जाळ.........
छत्रपति म्हणजे
अन्यायाचा कर्दनकाळ.......
जय जिजाउ....!!
जय शिवराय....!!
जय शभुंराजे....
Labels:
chatrapati,
description,
heritage,
lekh,
mahraj,
marathi,
poem,
powada,
sant tukaram,
shivaji,
writeup
Monday, December 31, 2012
Sunday, November 25, 2012
Tujhya Wina - Marathi Poem
Labels:
dedication,
greeting,
kawita,
love,
marathi,
marathi kawita,
picture,
poem,
prem,
tujhya wina,
words
Subscribe to:
Posts (Atom)
मूळ पान (Home Page)
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥