शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका,
आज उगाचच खुप वर्षांनी आठवली!
शाळा तर कधीचीच संपलीय, पण,
परीक्षेची धडधड मात्रं तशीच राहीलीय!!
"शब्दांचे अर्थ लिहा" म्हटल्यावर,
अचूक अर्थ आठवायचेत!
आता अर्थही बदललेत आणि,
शब्दही अनोळखी झालेत!!
"समानार्थी, विरुद्धार्थी शब्द",
गुण हमखास मिळायचेत!
आता समानार्थी भाव, विरुद्धार्थी बनलेत,
अन अर्थांचे अनर्थ झालेत!!
"गाळलेल्या जागा भरा",
हा प्रश्नं पैकीच्या पैकी गुण देणारा!
प्रश्नपत्रिकेतल्या सगळ्याच,
गाळलेल्या जागा भरल्यात!
आयुष्यातल्या काही जागा मात्रं,
आजही रिकाम्याच राहील्यात!!
पेपरातल्या "जोड्या जुळवा",
क्षणार्धात जुळायच्यात!
पण नात्यांच्या जोड्या,
कधी जुळल्यात,तर कधी,
जुळता जुळता फसल्यात!
"एका वाक्यातल्या उत्तरा"नं पाच मिनिटात,
पाच गुण मिळवून दिलेत!
आयुष्यातले काही सोप्पे प्रश्नं,
आजही तिथेच तटस्थ उभे आहेत,
एकाच जागी...उत्तराची वाट बघत..
"संदर्भासहीत स्पष्टीकरण" लिहिताच,
पाच पैकी साडेतीन गुण मिळायचेच!
आता स्पष्टीकरण देता देता,
बरेचसे संदर्भ मागे पडलेत!!
"कवितेच्या ओळी पुर्ण" करणं,
अगदी आवडता प्रश्नं!
आजही शोध सुरु आहे,
कवितेच्या सुंदर ओळींचा!
एका चालीत, एका सुरात गाताना,
मिळेल कधीतरी, पुर्णत्वं आयुष्याला!!
"निबंध लिहा", किंवा "गोष्टं लिहा",
पाचापैकी तीन गुण देणारच देणार!
आता कितीही कल्पना लढवा,
किंवा, म्हणींवरुन गोष्ट तयार करा,
पण त्याचा विस्तार मात्रं नियतीच ठरवणार!!
तेंव्हा अभ्यासक्रमावरुन परीक्षा द्यायचो!
काही प्रश्नं "option" ला ही टाकायचो!
आता परीक्षा आधीच द्यावी लागते,
अभ्यासक्रम मात्रं नंतर कळतो!!
आयुष्याचा अभ्यासक्रम अनोळखी असतो,
आणि कुठलाच प्रश्नं ऐच्छिक नसतो!!
शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका,
आज उगाच खुप वर्षांनीj आठवली...
तेंव्हाची परीक्षा आज फारच सोप्पी वाटली!!
Marathi culture, literature, recipes, interpretation, short stories, movies, lyrics and discussion for the Marathi community in the US and world over. -- लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
Showing posts with label lekh. Show all posts
Showing posts with label lekh. Show all posts
Sunday, December 29, 2019
Wednesday, January 25, 2017
Wangi premachi kahani
कुणास ठाऊक का पण मला "वांगी" लै भारी फळभाजी वाटते...
वांग्यावरील प्रेमापोटीच मला वांग-मय फार आवडत...
एकतर वांगी सर्वत्र सहज उपलब्ध असतात, त्यांना atittitude वगैरे काहीही नसतो आणि भाजीच्या टोपलीत वांग पद्मनाभाच्या मूर्तीप्रमाणे मुकुट घालून कायम निवांत निजलेलं असत...
वांग तस पूर्णतः नॉन-ग्लॅमरस पात्र...
पूर्वी टीव्हीवर भाज्यांचं एक कार्टून यायचं, त्यात वांग हे अट्टल दारुड दाखवायचं, बघताना लै मजा यायची...
मांसाहारी पार्टीत शाकाहारी मित्रांचा एकमेव आधार म्हणजे भरिताची पोट सुटलेली स्थूल वांगी...
वांगी बघून कुणालाही फार आनंद होत नसला तरी दुःखही होत नाही. शिवाय वांग्याची भाजी अतिशय सहज रेसिपी. कांदा-लसूण पेस्ट, टमाटर, मिर्ची, हळद, तिखट मीठ घालून त्यात वांग्याच्या फोडी घालून थोडं पाणी घातलं आणि वरून मटण मसाला घातला की जगातील साऱ्या भाज्या त्यापुढे झक मारतात...
वांग्याच्या लंबुळका आकार पाहून मला "बिना पायल के ही बजे घुंगरू" गाण्यातील संजय कपूरची "क्या तुने किया जादूsss" म्हणतानाची हनुवटी आठवते. त्यावेळी त्याचा चेहरा हा लंबुळक्या वांग्याप्रमाणेच दिसतो. त्यात त्याची को-स्टार माधुरी दीक्षित, म्हणजे फुल्ल पनीर बैगन मसाला...
Wednesday, July 8, 2015
Shala aani college
शाळा : म्हणजे गणवेश, नीटनेटकेपणा.....
काॅलेज : म्हणजे कसाही अवतार
आणि स्टाईल.....

शाळा : पेन्सिल, रबर, शार्पनर, पेन,
पट्टी.....
काॅलेज : एक बॉलपेन तो पण
मित्राकडून घेतलेला......

शाळा : वर्गात येण्याआधी "टीचर, मे आय कम इन..?" किंवा "टीचर, मी आत येवू का...?"
काॅलेज : वर्गाजवळ येणार, किती बसलेत ते बघणार आणि मोबाईल कानाला लावून परत जाणार.

शाळा : सर्व विषयांची पुस्तक
आणि वह्या स्वतःजवळ ठेवणार...!
काॅलेज : मित्राला बोलणार "अरे यार एक पेज तर दे ना".

शाळा : पेपर लवकर देवून निघाला तर सर्व बोलणार, काय स्कॉलर आहे हा यार.
काॅलेज : फ्रेंड्स बोलणार "काही येत
नाही त्याला म्हणून निघालाय".
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
शाळा : उशिरा आले कि शेवटच्या बाकावर बसावे लागते.
काॅलेज : उशिरा आले कि पहिल्या बाकावर बसावे लागते.
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
शाळा : म्हणजे व्यवस्थित पाठांतर.
काॅलेज : म्हणजे नुसता रट्टा.
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
शाळा : म्हणजे मजा, मस्ती, धमाल.
काॅलेज : म्हणजे जस्ट चिल यार.
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
शाळा : यार, मला ती आवडते.
काॅलेज : सांभाळून बघ रे वहिनी आहे........
miss you my all sweet friends
Monday, November 4, 2013
Chatrapati mhanaje
छत्रपति म्हणजे
जिजाउच्यां गळ्यातली मोत्याची माळ.........
छत्रपति म्हणजे
सईचं कुकंवान भरलेल कपाळ.........
छत्रपति म्हणजे
बलीदानी पुत्र ज्याचा शभुंबाळ.........
छत्रपति म्हणजे
तुकोबारायाच्यां अभंगातला टाळ.........
छत्रपति म्हणजे
सोन्याच्या नागराला चादींचा फाळ.........
छत्रपति म्हणजे
कायम अठवणीतले आभाळ.........
छत्रपति म्हणजे
कतृत्वच्या सरीने हिरवा झालेला रानमाळ.........
छत्रपति म्हणजे
ज्यान भारतमातेच्या पायात बाधंली सोन्याची चाळ.........
छत्रपति म्हणजे
गनिमासाठी तुफाणी जजांळ.........
छत्रपति म्हणजे
ज्याच्यापुढ शीजली नाही मुगलाचीं डाळ.........
छत्रपति म्हणजे
ज्यान स्वर्गात जाउन बाधंला सोन्याचा सात मजली ताळ.........
छत्रपति म्हणजे
औरगंजेबाला स्वप्नात् भासलेला महाकाळ.........
छत्रपति म्हणजे
भगव्या स्वराज्याचा सुवर्णकाळ.........
छत्रपति म्हणजे
येणा-या प्रत्येक पीढीचा भविष्यकाळ.........
छत्रपति म्हणजे
परक्रमाच्या काळजातला जाळ.........
छत्रपति म्हणजे
अन्यायाचा कर्दनकाळ.......
जय जिजाउ....!!
जय शिवराय....!!
जय शभुंराजे....
जिजाउच्यां गळ्यातली मोत्याची माळ.........
छत्रपति म्हणजे
सईचं कुकंवान भरलेल कपाळ.........
छत्रपति म्हणजे
बलीदानी पुत्र ज्याचा शभुंबाळ.........
छत्रपति म्हणजे
तुकोबारायाच्यां अभंगातला टाळ.........
छत्रपति म्हणजे
सोन्याच्या नागराला चादींचा फाळ.........
छत्रपति म्हणजे
कायम अठवणीतले आभाळ.........
छत्रपति म्हणजे
कतृत्वच्या सरीने हिरवा झालेला रानमाळ.........
छत्रपति म्हणजे
ज्यान भारतमातेच्या पायात बाधंली सोन्याची चाळ.........
छत्रपति म्हणजे
गनिमासाठी तुफाणी जजांळ.........
छत्रपति म्हणजे
ज्याच्यापुढ शीजली नाही मुगलाचीं डाळ.........
छत्रपति म्हणजे
ज्यान स्वर्गात जाउन बाधंला सोन्याचा सात मजली ताळ.........
छत्रपति म्हणजे
औरगंजेबाला स्वप्नात् भासलेला महाकाळ.........
छत्रपति म्हणजे
भगव्या स्वराज्याचा सुवर्णकाळ.........
छत्रपति म्हणजे
येणा-या प्रत्येक पीढीचा भविष्यकाळ.........
छत्रपति म्हणजे
परक्रमाच्या काळजातला जाळ.........
छत्रपति म्हणजे
अन्यायाचा कर्दनकाळ.......
जय जिजाउ....!!
जय शिवराय....!!
जय शभुंराजे....
Labels:
chatrapati,
description,
heritage,
lekh,
mahraj,
marathi,
poem,
powada,
sant tukaram,
shivaji,
writeup
Monday, August 27, 2012
What is love? प्रेम म्हणझे नेमके काय
मला माझ्या मित्राने विचारले कि प्रेम म्हणझे नेमके काय ?
मी त्याला सागितले की,
कितीही जवळ जाणार असेल तरी गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम....
दिवाळीला स्वतःसाठी साधे कपडे न घेता मुला-मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स आणि कपडे घेणारे बाबा म्हणजेप्रेम....
कितीही मस्ती केली व रात्री लेट झाले तरी आई-बाबाना न सांगता हळूच दार उघडणारे आजी-आजोबा म्हणजे प्रेम....
कितीही वाद झाले तरी दादा जेवलास का अशी विचाणारी बहिण म्हणजे प्रेम...
पगार कितीही कमी असेल तरी दिवाळी भाऊभीजला बहिणीच्या पसंतीचे घड्याळ घेणारा भाऊ म्हणजे प्रेम....
आणि या सर्वांची काळजी घेवून स्वतःची काळजी न करता सकाळी पहाटे उठून जेवणाचा डबा बनवणारी बायको म्हणजे प्रेम....
Saturday, October 22, 2011
Prem kaay asta? Marathi lekh
मला माझ्या मित्राने विचारले कि प्रेम म्हणझे नेमके काय ? मी त्याला सागितले की, कितीही जवळ जाणार असेल तरी गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम.... दिवाळीला स्वतःसाठी साधे कपडे न घेता मुला-मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स आणि कपडे घेणारे बाबा म्हणजे प्रेम.... कितीही मस्ती केली व रात्री लेट झाले तरी आई-बाबाना न सांगता हळूच दार उघडणारे आजी-आजोबा म्हणजे प्रेम.... कितीही वाद झाले तरी दादा जेवलास का अशी विचाणारी बहिण म्हणजे प्रेम... पगार कितीही कमी असेल तरी दिवाळी भाऊभीजला बहिणीच्या पसंतीचे घड्याळ घेणारा भाऊ म्हणजे प्रेम.... आणि या सर्वांची काळजी घेवून स्वतःची काळजी न करता सकाळी पहाटे उठून जेवणाचा डबा बनवणारी बायको म्हणजे प्रेम....
Saturday, May 14, 2011
Sindhu tai sakpal hyaane kaahi khupte tithe gupte war mhantlelya goshti
Sudhir bhatanchi ek kavita tyaan ne mhantlya -
ghetala mi shwas jevha kanth hota kapalelapolalela pran majha bolanya adhich gelajivanachi pretyatra thambali jevha smashanighetala kadhun khanda olakhichya manasani
Ani kahi changali wakye ji hyat sindhutai mhanalya :-
Ajun baryach kaahi hotya.. jamlyas shrotyaan ne comments madhye lihaawya.. :)Deva malahasayala shikawAmhi kadhi radalo hoto hyacha wisar padu deu nako
Jab who aye to cheharepe rakhrakhaw thaMagar wo nahi dekh sake jo mere dil ka ghav tha
Labels:
changli wakye,
choti kavita,
hindi,
kawita,
khupte tithe gupte,
lekh,
marathi,
sindhu tai sakpal,
sudhir bhat
Friday, May 13, 2011
दोन फुलपाखरे प्रेमात पडली होती
दोन फुलपाखरे प्रेमात पडली होती...एके दिवशी ते लपा-छपि खेळत होते, खेळताना .......
मुलगा फुलपाखरू :- चल एक छोटासा नवीन खेळ आपल्या दोघांच्यात ....
मुलगी फुलपाखरू :- हो चालेल !!
मुलगा फुलपाखरू :- आपल्या दोघांमध्ये, सकाळी सकाळी ह्या समोरच्या फुला मध्ये जो सर्वात प्रथम बसलेला असेल तो दुसऱ्या पेक्षा जास्त प्रेम करतो ....
मुलगी फुलपाखरू :- हो चालेल !!
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी, मुलगा फुलपाखरू त्या फुलाच्या जवळ येऊन उभा राहिला आणि ते फुल उमलण्याची वाट पाहू लागला जेणेकरून तो तिच्या आधी त्या फुलामध्ये बसेल आणि तिला दाखवून देईल कि त्याचे तिच्यावर खूप खूप प्रेम आहे ....
थोड्याच वेळात फुल उमलले ........ पाहतो तर काय ????????????
.
.
.
.
ती मुलगी फुलपाखरू त्या उमलेल्या फुला मध्ये मरून पडली होती . कारण, रात्रभर ती त्या फुला मधेच राहिली होती फक्त ह्या वेड्या अपेक्षेने कि सकाळ होताच आणि ते फुल उमलताच ती त्या मुलगा फुलपाखरू कडे आनंदाने झेप घेईल आणि त्याला दाखवून देईल कि ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करते ते ..........
Labels:
butterfly,
fulapakare,
lekh,
maathi,
marathi article,
prem,
story,
you are in love
Thursday, May 5, 2011
Facebook Varchi Maitri
मित्रांचे कट्टे आजकाल ओसंच पडतात..
कुणी 'orkut' वर तर कुणी 'Facebook' वर जमतात..
प्रत्यक्ष भेटीत सगळेच बुचकळयात पडतात..
कारण सगळे विषय 'chat' वरच संपलेले असतात..
मग 'chat' वर भेटूच " याचं Promise होतं..
आणि संभाषणातून 'Sign out' के लं जातं. ..
'लाल' 'हिरव्या ' दिव्यांच्या गर्दित मग हरवायला होतं...
घट्ट पकडलेलया हातांनाही सैल सुटायला होतं..
'Available' आणि 'Busy' मध्ये
प्रतेकाचा status घुटमळत राहतो...
आपणहून add केलेल्या मित्रपासून लापन्यकारिता
'Invisible'चा आडोसा घेतला जातो..
ताप आल्याच आजकाल आईच्या आधी 'Facebook' ला कळत..
औषध पेक्षा 'Take Care' च्या डोसेजनीच तापालाही पळायला होतं..
मनातलं सगळं 'Facebook' वर ओकायची
मैत्रीत गरजच का असावी?
नात्यांना धरून ठेवायला
'Net''ची जाळीच का असावी?
कधीतरी वाटतं पुन्हा कट्ट्यावर जमावं..
'chat' ला गप्पानी आणि 'Smile' ना हस्यानी replace करावं..
शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं
मैतीचं खरं समाधान खंद्यावरच्या हातात असतं....
...............एक मित्र
चला तर पूर्वी चे दिवस पुन्हा अनुभावुया ,
मैत्रीला technology पासून जपून ठेवुया ......
कुणी 'orkut' वर तर कुणी 'Facebook' वर जमतात..
प्रत्यक्ष भेटीत सगळेच बुचकळयात पडतात..
कारण सगळे विषय 'chat' वरच संपलेले असतात..
मग 'chat' वर भेटूच " याचं Promise होतं..
आणि संभाषणातून 'Sign out' के लं जातं. ..
'लाल' 'हिरव्या ' दिव्यांच्या गर्दित मग हरवायला होतं...
घट्ट पकडलेलया हातांनाही सैल सुटायला होतं..
'Available' आणि 'Busy' मध्ये
प्रतेकाचा status घुटमळत राहतो...
आपणहून add केलेल्या मित्रपासून लापन्यकारिता
'Invisible'चा आडोसा घेतला जातो..
ताप आल्याच आजकाल आईच्या आधी 'Facebook' ला कळत..
औषध पेक्षा 'Take Care' च्या डोसेजनीच तापालाही पळायला होतं..
मनातलं सगळं 'Facebook' वर ओकायची
मैत्रीत गरजच का असावी?
नात्यांना धरून ठेवायला
'Net''ची जाळीच का असावी?
कधीतरी वाटतं पुन्हा कट्ट्यावर जमावं..
'chat' ला गप्पानी आणि 'Smile' ना हस्यानी replace करावं..
शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं
मैतीचं खरं समाधान खंद्यावरच्या हातात असतं....
...............एक मित्र
चला तर पूर्वी चे दिवस पुन्हा अनुभावुया ,
मैत्रीला technology पासून जपून ठेवुया ......
Monday, April 18, 2011
विचार करा....फक्त ५ मिनिट्स
एकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं...
असं वाटण्याची जागा,
मूल झालं की...
मोठं घर झालं की...
अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते .
दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत . ती जरा मोठी झाली की सारं ठीक होईल , अशी आपण मनाची समजूत घालू लागतो .
असं वाटण्याची जागा,
मूल झालं की...
मोठं घर झालं की...
अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते .
दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत . ती जरा मोठी झाली की सारं ठीक होईल , अशी आपण मनाची समजूत घालू लागतो .
Wednesday, March 9, 2011
कामाचा ताण :एक आसन
कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी...........कामाचे ओझे जास्त असल्यास खालील आसनाचा प्रयोग करुन पहा....कामाचा ताण नक्की कमी झालेला जाणवेल
१) प्रथम टेबलावरील काम थोडे बाजुला करावे...
२) ते जमत नसल्यास तुमची खुर्ची टेबलापासुन थोडी मागे घ्या..
३) डोळे मिटा..हात डोक्या मागे घ्या
४) दीर्घ श्वास घ्या
५) श्वास हळू सोडा ( असे पाच वेळा करा)
६) पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या ( डोळे बंदच राहु द्या
७) या वेळी श्वास जोरात सोडा
८) श्वास सोडताना हात झटका
९) हात झटकताना तेव्हढ्याच त्वेशाने पुट्पुटा ............ .( खड्ड्यात जाउदे कंपनी.....)
१) प्रथम टेबलावरील काम थोडे बाजुला करावे...
२) ते जमत नसल्यास तुमची खुर्ची टेबलापासुन थोडी मागे घ्या..
३) डोळे मिटा..हात डोक्या मागे घ्या
४) दीर्घ श्वास घ्या
५) श्वास हळू सोडा ( असे पाच वेळा करा)
६) पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या ( डोळे बंदच राहु द्या
७) या वेळी श्वास जोरात सोडा
८) श्वास सोडताना हात झटका
९) हात झटकताना तेव्हढ्याच त्वेशाने पुट्पुटा ............ .( खड्ड्यात जाउदे कंपनी.....)
कामाचा ताण नक्की कमी झालेला जाणवेल
हळदी कुंकू - पण राजकीय
आपल्या नवऱ्यांची भांडणं असोत किंवा मतभेद असोत, बायकांनी मात्र त्या भांडणांची सावली आपल्यावर पडू देऊ नये असं ठरविले. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणातील रथी-महारथी, आघाडी-युती, लातूर-बारामती या सगळ्यांच्या बायका एकत्र आल्या आणि त्यांनी हळदी-कुंकवाचा जंगी कार्यक्रम केला. हसणं, खिदळणं, खाणं, गप्पा असा कार्यक्रम धमाल रंगला. आणि मग कोणीतरी टूम काढली नाव घेण्याची. अर्थातच नाव घेण्याचा पहिला मान मुख्यमंत्र्यांच्या बायकोचा. त्यामुळं सगळ्यांनी आग्रह करून मिसेस सत्वशीला चव्हाणांना खुर्चीवर बसवलं आणि उखाण्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. दिल्लीत राहून असल्या कार्यक्रमांचा खरं तर त्यांना विसर पडला होता; परंतु नवऱ्याचा आदर्श बाळगून त्यांनी लगेचच इथल्या वातावरणाचा सराव करून घेतला. घसा साफ केला आणि नाव घेतलं-
इथली थंडी अशी तशीच, दिल्लीत थंडी जोरात
बिल्डर आला दारात, की पृथ्वीराज घुसतात घरात
अर्थात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. मुख्यमंत्र्यांच्या बायकोच्या पाठोपाठ उखाणा घेण्याचा आपला हक्क मिसेस भुजबळ किंवा मिसेस आबा यांनी हिरावून घेऊ नये म्हणून अजितदादांच्या बायकोनं चपळाई केली आणि खुर्ची गाठली. सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. आणि शांतता होताच सुनेत्रा पवार यांनी उखाणा सुरू केला-
वाट पाहायची हद्द झाली, कित्ती कित्ती वाट पाहिली
अजितरावांची आता फक्त एकच पायरी राहिली
काँग्रेस आणि राष्ट्रवादी झाल्यावर आता भाजपाला संधी मिळाली पाहिजे, असा विचार करीत प्रज्ञा मुंडे यांनी खुर्चीकडे धाव घेतली; परंतु त्याआधीच नीलम राणेंनी खुर्चीचा ताबा घेतला होता. त्यामुळं त्यांना बाजूला उभे राहावे लागले. नीलमताईंनी चारी बाजूला नजर वळवून एखाद्या फलंदाजानं फिल्डिंगचा अंदाज घ्यावा तसा अंदाज घेतला आणि मग खणखणीत आवाज लावला-
समुद्रावर वारा सुटला की नारळ-सुपारी आनंदानं झुलते
‘अहो मुख्यमंत्री’ म्हटलं की नारायणरावांची कळी खुलते
नीलमताई डौलात उठल्या आणि प्रज्ञा मुंडे खुर्चीवर बसल्या. मिसेस गडकरींनी कान टवकारले आणि त्या खुर्चीच्या जवळ सरकल्या. प्रज्ञा मुंडेंनी उखाणा घेतला-
अंगात जाकिट, खिशात पाकिट, अंगठीत चार खडे
गोपीनाथराव, तुम्ही धीर नका सोडू गडे
चारही बाजूंनी या उखाण्याला मोठा प्रतिसाद मिळाला आणि कांचन गडकरींनी खुर्चीत पटकन् स्वत:ला झोकून दिलं. वैदर्भी अघळपघळ स्वभावानुसार त्यांनी थेट उखाणा सुरूही केला-
नाश्त्याला वडे, जेवणात खीर, दुपारी भेळ, रात्री हॉटेलात जाऊ
तरी नितीनराव म्हणतात, सांग- मधल्या वेळेत काय खाऊ?
पुढे जाऊ की नको अशा द्विधा मन:स्थितीत असलेल्या आर. आर. आबांच्या बायकोला मीनाताई भुजबळांनी हातानं धरून आणलं आणि खुर्चीवर बसवलं. मग सुमन आबा पाटील यांनी जरा संकोचत संकोचत उखाणा म्हटला-
कुणी म्हणतं हाटेल, आन कुणी म्हणतं ढाबा
सासरी आल्यावरच कळलं, नवऱ्याला म्हणत्यात आबा
या उखाण्यानं सगळीकडेच एकच जल्लोश झाल्यावर चहासाठी कमर्शियल ब्रेक जाहीर करण्यात आला.
’ ’
ब्रेकनंतर सगळ्यांचं स्वागत वगैरे झालं आणि आबांच्या बायकोने भुजबळांच्या बायकोला खुर्चीवर बसवीत फिट्टंफाट करून टाकली. मीनाताई भुजबळांनी मनातल्या मनात भुजबळांचा धावा केला आणि नाव घेतलं-
नव्या जमान्यात, नव्यानं लिहिली पाहिजे आता एबीसी
छगनरावांच्या बाराखडीत पहिली अक्षरं ओबीसी
मीनाताई उठून राष्ट्रवादींच्या बायकांत जाऊन बसल्या तोवर रश्मी ठाकरेंनी खुर्ची गाठली. त्याचवेळी शर्मिला ठाकरेही तिथं पोचल्या. दोघींमध्ये जणू संगीत खुर्चीची स्पर्धा लागली. परंतु वैशाली देशमुख पुढे सरसावल्या आणि शर्मिलाला म्हणाल्या, ‘अगं, ती मोठी आहे तुझ्यापेक्षा.. तिचा मान पहिला.’ शर्मिलाकडे विजयी मुद्रेने पाहत रश्मीताईंनी खुर्चीवर बसत उखाणा सुरू केला-
कधी कधी बघतात माझ्याकडे ते अशा काही चेहऱ्यानं
उद्धवरावांचा काढते फोटो, मी हृदयाच्या कॅमेऱ्यानं
रश्मीताईंच्या उखाण्याला मिळालेली दाद पाहून शर्मिला ठाकरेंवरची जबाबदारी वाढली. त्यांनी साडीचा पदर कमरेला खोचत पोज घेतली आणि उखाणा मारला-
‘मराठीत म्हणतात पाच, त्याला इंग्रजीत म्हणतात फाइव्ह
सगळ्यांची भाषणं ‘डेड’ फक्त राजचंच भाषण ‘लाइव्ह’
वातावरणात राजकीय ताण संपला. खेळीमेळीनं सगळं सुरू होतं. ते पाहून वैशाली देशमुखही मोकळ्या झाल्या. त्यांनी आग्रहाची वाट न पाहता खुर्चीवर बसत नाव घेतलं-
सदा मेला टकामका बघतो, एक नंबरचा चोंबडा
कोण म्हणता? अहो, विलासरावांच्या केसांचा कोंबडा!
हास्याची लकेर सर्वत्र उमटली. अशोकराव चव्हाणांची बायको मराठीत उखाणा घ्यायला संकोचत होती. वैशालीताई म्हणाल्या, ‘अगं, इंग्रजी चालेल!’ मग त्या उठल्या-
आऊट ऑफ टेन, एकसारखे असतात नाइन
यू डोंट वरी, नाऊ अशोकराव इज फाइन
मिसेस चव्हाणांच्या या खुलाशानंतर सगळ्यांनी मिळून आग्रहानं प्रतिभा पवारांना खुर्चीत बसवलं. त्यांनीही सगळ्यांचा मान ठेवला-
बारा कोस बारामती, दहा कोस वाई
शरदरावांचं नाव घेते, सुप्रियाची आई
इथंसुद्धा त्यांनी मुलीला प्रमोट केलं.. अशी कुजबूज यावर अजितदादांच्या बायकोनं केली.
Tuesday, December 28, 2010
Nakki wacha (Marathi Lekh)
हे लग्न झालेल्यांनी, न झालेल्यांनी
आणि लग्न होणार असलेल्यांनी .......
नक्कीच वाचा: विचार करा.
एका रात्री मी घरी आलो ते मनाशी काही ठरवूनच.
जेवताना मी तिचा हात हातात
घेतला आणि म्हणालो, "मला तुझ्याशी काही बोलायचं आहे."
तिच्या डोळ्यांत वेदना उमटली;
तरीही ती शांतपणे जेवत होती,
सगळे शब्द जुळवून मी तीला सांगितलं,
मला घटस्पोट हवाय."
तिने शांतपणे विचारल,- "का?"
तिचा प्रश्न मी टाळला, ती भडकली.
समोरच ताट तिने भिरकावून दिलं.
लग्न मोडायला नेमकं काय कारण आहे,
हे तिल जाणून घ्यायचं होत;
पण माझं मन दुसऱ्या स्त्रीवर आलय हे मि तिला
स्पष्टपणे सांगू शकत नव्ह्तो.
माझा बँक ब्यालन्स, कार, घर, सगळ मी तिला देऊ केलं:
पण मी समोर केलेल्या घटस्पोटाच्या कागदाचे तिने तुकडे केले.
दुसऱ्या दिवसी तिने माझ्यासमोर घटस्पोटा विषयीच्या अटीचा कागद समोर केला.
तिला माझ्याकडून काहीही नको होते, फक्त एक महिन्याची नोटीस हवी होती आणि
या एक महिन्यात दोघांनीही नॉर्मल रहावं अशी तिची इश्च्या होती.
तिची कारणे साधी होती. महिन्या भरात आमच्या मुलाची परीक्षा होती
आणि त्याच्यावर काहीही परिणाम व्हायला नको होता.
तिची आणखी एक अट होती.
लग्नाच्या दिवसी मी तिला बेडरूम पर्यंत कसं उचलून नेलं होत.
त्याप्रमाणे रोज महिनाभर तिला न्यायचं होत तशी तिची अटच होती.
मला वाटलं तिला वेड लागलंय; पण महिना व्यवस्थित जावा यासाठी मी तिची अट मान्य केली.
घटस्पोटाच्या विचारामुळे अनेक दिवस माझा पत्नीसोबतचा संपर्कच झालेला नव्हता. त्यामुळे पहिल्या दिवसी बेडरूम पर्यंत तिला नेताना आम्ही दोघही फार अवघडून गेलो.
मी तिचा हात धरून बेडरूम पर्यंत नेतान माझ्या मुलाने
बघितलं आणि त्याला फार आनंद झाला.
दुसया दिवसी ती माझ्या छातीला टेकून होती.
आपण आपल्या बायकोकडे बरेच दिवस
नित बघितलेच नाही हे मला जाणवलं;
आणि तिचा सहवास मला अचानक हवाहवासा वाटू लागला. आपण हिच्या बाबतीत असा अचानक निर्णय का घेतोय,
असा प्रश्न पडला.
त्यानंतरच्या प्रत्येक दिवसी तिला उचलून किंवा सोबन बेडरूम पर्यंत नेताना आमच्यातली एक हवीहवीशी जवळीक वाढत असल्याचं मला जाणवलं.
रोजच्या प्रमाणे तिला अचानक उचलताना मला जाणवलं, तीच वजन कमी झालंय. हृदयातल्या वेदनाचां
हा परिणाम होता. मी आस्थेने तिच्या कपाळाला स्पर्श केला.
दिवसागणिक तिचं कमी होणारं वजन
माझी काळजी वाढवत होत. पण तिच्या अटीच
पालन करताना मला आंतरिक समाधान मिळत होत, आमच्यात काय घडतंय याची कल्पना
नसतानाही आमचा मुलगा खूप खुश होता.
आमच्यात दुरावा निर्माण झाला होता कारण आमच्यातली जवलीकच संपली होती.
जी परत आयुष्यात येत होती.
महिन्याच्या शेवटच्या दिवसी - मी मनाशी निर्णय घेतला. माझ्या प्रेयसीच्या घरी आलो आणि मी माझ्या पत्नीला घटस्पोट देऊ शकत नसल्याच स्पष्टपणे सांगितले.
ती चिडली, संतापली, पण आता मला काही यैकायाच
नव्हते. माझ्या प्रिय पत्नीचा हात मला आता मरे पर्यंत सोडायचा नव्हता.
मी वेगाने CAR चालवत घरी आलो.
माझ्या चेहऱ्यावर हसू होत.
हातात फुलांचा गुच्छ होता. मी बेडरूम मध्ये पोहचलो, तर... माझी प्रिय पत्नी बेडवर निष्प्राण पडलेले होती.
मुलाला जवळ घेऊन मी अनावर रडत सुटलो.
माझ्या प्रेमापायी तिने जीव दिला होता. ती असताना मी जे करायला हव ते केल नाही.
जे प्रेम , जी जवळीक तिला हवी होती ती मी तिला दिली नाही. आता माझे अश्रू तिला परत आणू शकत नव्हते.
पती-पत्नीच्या नात्यात कार, बंगला, प्रेयसी, पैसा काहीही महत्वाच नाही.
महत्वाच आहे ते प्रेम, जवळीक आणि विश्वास.
आणि लग्न होणार असलेल्यांनी .......
नक्कीच वाचा: विचार करा.
एका रात्री मी घरी आलो ते मनाशी काही ठरवूनच.
जेवताना मी तिचा हात हातात
घेतला आणि म्हणालो, "मला तुझ्याशी काही बोलायचं आहे."
तिच्या डोळ्यांत वेदना उमटली;
तरीही ती शांतपणे जेवत होती,
सगळे शब्द जुळवून मी तीला सांगितलं,
मला घटस्पोट हवाय."
तिने शांतपणे विचारल,- "का?"
तिचा प्रश्न मी टाळला, ती भडकली.
समोरच ताट तिने भिरकावून दिलं.
लग्न मोडायला नेमकं काय कारण आहे,
हे तिल जाणून घ्यायचं होत;
पण माझं मन दुसऱ्या स्त्रीवर आलय हे मि तिला
स्पष्टपणे सांगू शकत नव्ह्तो.
माझा बँक ब्यालन्स, कार, घर, सगळ मी तिला देऊ केलं:
पण मी समोर केलेल्या घटस्पोटाच्या कागदाचे तिने तुकडे केले.
दुसऱ्या दिवसी तिने माझ्यासमोर घटस्पोटा विषयीच्या अटीचा कागद समोर केला.
तिला माझ्याकडून काहीही नको होते, फक्त एक महिन्याची नोटीस हवी होती आणि
या एक महिन्यात दोघांनीही नॉर्मल रहावं अशी तिची इश्च्या होती.
तिची कारणे साधी होती. महिन्या भरात आमच्या मुलाची परीक्षा होती
आणि त्याच्यावर काहीही परिणाम व्हायला नको होता.
तिची आणखी एक अट होती.
लग्नाच्या दिवसी मी तिला बेडरूम पर्यंत कसं उचलून नेलं होत.
त्याप्रमाणे रोज महिनाभर तिला न्यायचं होत तशी तिची अटच होती.
मला वाटलं तिला वेड लागलंय; पण महिना व्यवस्थित जावा यासाठी मी तिची अट मान्य केली.
घटस्पोटाच्या विचारामुळे अनेक दिवस माझा पत्नीसोबतचा संपर्कच झालेला नव्हता. त्यामुळे पहिल्या दिवसी बेडरूम पर्यंत तिला नेताना आम्ही दोघही फार अवघडून गेलो.
मी तिचा हात धरून बेडरूम पर्यंत नेतान माझ्या मुलाने
बघितलं आणि त्याला फार आनंद झाला.
दुसया दिवसी ती माझ्या छातीला टेकून होती.
आपण आपल्या बायकोकडे बरेच दिवस
नित बघितलेच नाही हे मला जाणवलं;
आणि तिचा सहवास मला अचानक हवाहवासा वाटू लागला. आपण हिच्या बाबतीत असा अचानक निर्णय का घेतोय,
असा प्रश्न पडला.
त्यानंतरच्या प्रत्येक दिवसी तिला उचलून किंवा सोबन बेडरूम पर्यंत नेताना आमच्यातली एक हवीहवीशी जवळीक वाढत असल्याचं मला जाणवलं.
रोजच्या प्रमाणे तिला अचानक उचलताना मला जाणवलं, तीच वजन कमी झालंय. हृदयातल्या वेदनाचां
हा परिणाम होता. मी आस्थेने तिच्या कपाळाला स्पर्श केला.
दिवसागणिक तिचं कमी होणारं वजन
माझी काळजी वाढवत होत. पण तिच्या अटीच
पालन करताना मला आंतरिक समाधान मिळत होत, आमच्यात काय घडतंय याची कल्पना
नसतानाही आमचा मुलगा खूप खुश होता.
आमच्यात दुरावा निर्माण झाला होता कारण आमच्यातली जवलीकच संपली होती.
जी परत आयुष्यात येत होती.
महिन्याच्या शेवटच्या दिवसी - मी मनाशी निर्णय घेतला. माझ्या प्रेयसीच्या घरी आलो आणि मी माझ्या पत्नीला घटस्पोट देऊ शकत नसल्याच स्पष्टपणे सांगितले.
ती चिडली, संतापली, पण आता मला काही यैकायाच
नव्हते. माझ्या प्रिय पत्नीचा हात मला आता मरे पर्यंत सोडायचा नव्हता.
मी वेगाने CAR चालवत घरी आलो.
माझ्या चेहऱ्यावर हसू होत.
हातात फुलांचा गुच्छ होता. मी बेडरूम मध्ये पोहचलो, तर... माझी प्रिय पत्नी बेडवर निष्प्राण पडलेले होती.
मुलाला जवळ घेऊन मी अनावर रडत सुटलो.
माझ्या प्रेमापायी तिने जीव दिला होता. ती असताना मी जे करायला हव ते केल नाही.
जे प्रेम , जी जवळीक तिला हवी होती ती मी तिला दिली नाही. आता माझे अश्रू तिला परत आणू शकत नव्हते.
पती-पत्नीच्या नात्यात कार, बंगला, प्रेयसी, पैसा काहीही महत्वाच नाही.
महत्वाच आहे ते प्रेम, जवळीक आणि विश्वास.
Subscribe to:
Posts (Atom)
मूळ पान (Home Page)
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥