शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका,
आज उगाचच खुप वर्षांनी आठवली!
शाळा तर कधीचीच संपलीय, पण,
परीक्षेची धडधड मात्रं तशीच राहीलीय!!
"शब्दांचे अर्थ लिहा" म्हटल्यावर,
अचूक अर्थ आठवायचेत!
आता अर्थही बदललेत आणि,
शब्दही अनोळखी झालेत!!
"समानार्थी, विरुद्धार्थी शब्द",
गुण हमखास मिळायचेत!
आता समानार्थी भाव, विरुद्धार्थी बनलेत,
अन अर्थांचे अनर्थ झालेत!!
"गाळलेल्या जागा भरा",
हा प्रश्नं पैकीच्या पैकी गुण देणारा!
प्रश्नपत्रिकेतल्या सगळ्याच,
गाळलेल्या जागा भरल्यात!
आयुष्यातल्या काही जागा मात्रं,
आजही रिकाम्याच राहील्यात!!
पेपरातल्या "जोड्या जुळवा",
क्षणार्धात जुळायच्यात!
पण नात्यांच्या जोड्या,
कधी जुळल्यात,तर कधी,
जुळता जुळता फसल्यात!
"एका वाक्यातल्या उत्तरा"नं पाच मिनिटात,
पाच गुण मिळवून दिलेत!
आयुष्यातले काही सोप्पे प्रश्नं,
आजही तिथेच तटस्थ उभे आहेत,
एकाच जागी...उत्तराची वाट बघत..
"संदर्भासहीत स्पष्टीकरण" लिहिताच,
पाच पैकी साडेतीन गुण मिळायचेच!
आता स्पष्टीकरण देता देता,
बरेचसे संदर्भ मागे पडलेत!!
"कवितेच्या ओळी पुर्ण" करणं,
अगदी आवडता प्रश्नं!
आजही शोध सुरु आहे,
कवितेच्या सुंदर ओळींचा!
एका चालीत, एका सुरात गाताना,
मिळेल कधीतरी, पुर्णत्वं आयुष्याला!!
"निबंध लिहा", किंवा "गोष्टं लिहा",
पाचापैकी तीन गुण देणारच देणार!
आता कितीही कल्पना लढवा,
किंवा, म्हणींवरुन गोष्ट तयार करा,
पण त्याचा विस्तार मात्रं नियतीच ठरवणार!!
तेंव्हा अभ्यासक्रमावरुन परीक्षा द्यायचो!
काही प्रश्नं "option" ला ही टाकायचो!
आता परीक्षा आधीच द्यावी लागते,
अभ्यासक्रम मात्रं नंतर कळतो!!
आयुष्याचा अभ्यासक्रम अनोळखी असतो,
आणि कुठलाच प्रश्नं ऐच्छिक नसतो!!
शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका,
आज उगाच खुप वर्षांनीj आठवली...
तेंव्हाची परीक्षा आज फारच सोप्पी वाटली!!
Marathi culture, literature, recipes, interpretation, short stories, movies, lyrics and discussion for the Marathi community in the US and world over. -- लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
Showing posts with label story. Show all posts
Showing posts with label story. Show all posts
Sunday, December 29, 2019
Monday, December 12, 2016
Bewada - Marathi Joke
एका बेवड्याने
मित्रांसाठी पार्टि करायचे
ठरवले...🍖🍗
आणि पार्टि साठी आपल्याच
घरातून बकरा चोरी करायच ठरवले.... 🐐
त्यांनी बकरा चोरला पण
आणि मित्रांसोबत मनसोक्त
पार्टि केली... 🍗🍖🐐
पण
सकाळी जेव्हा तो घरी आला तेव्हा बघतोय
काय ?
बकरा जिवंत..🐐
आपल्या बायकोला त्याने विचारल :-
हा बकरा इथे कसा..???
बायको :- बकरा गेला खड्यात तुम्ही पहिले हे
सांगा रात्री चोरासारखे येउन कुञ्याला कुठे घेऊन गेलात...???🐕
हसू नका !!!!!!!
पुडे पाठवा नवीन आहे
😂😂😂😂😂😜
मित्रांसाठी पार्टि करायचे
ठरवले...🍖🍗
आणि पार्टि साठी आपल्याच
घरातून बकरा चोरी करायच ठरवले.... 🐐
त्यांनी बकरा चोरला पण
आणि मित्रांसोबत मनसोक्त
पार्टि केली... 🍗🍖🐐
पण
सकाळी जेव्हा तो घरी आला तेव्हा बघतोय
काय ?
बकरा जिवंत..🐐
आपल्या बायकोला त्याने विचारल :-
हा बकरा इथे कसा..???
बायको :- बकरा गेला खड्यात तुम्ही पहिले हे
सांगा रात्री चोरासारखे येउन कुञ्याला कुठे घेऊन गेलात...???🐕
हसू नका !!!!!!!
पुडे पाठवा नवीन आहे
😂😂😂😂😂😜
Thursday, November 22, 2012
Ek Faslela Daaw (एक फसलेला डाव) - Marathi History
मोगली सैन्याशी निकराची पंजेफाड करत मावळी सेना लढतचं होती कारण परिस्थितीवर रडण्यापेक्षा परिस्थितीशी लढण्यात पुरुषार्थ मानणारी ही स्वराज्य सेना.
काळ होता १६९९ चा राजाराम महाराज गादीवर येऊन बराच काळ लोटला होता. मराठे सगळीकडेच मोघलांना धूळ चारत होती. भाउबंदकी नडली दुहीचा शाप पुन्हा एकदा दिसून आला.
एक लढवय्या आणि जिगरबाज सेनापतीस आपल्याच लोकांनीच दगा करून मारले होते. त्यांचे नांव संताजी घोरपडे.
पण धनाजी नावाचा वाघ अजून मैदान गाजवतच होता. मोगलांच्या प्रतिष्ठित सरदारांना धनाजी जाधव यांनी मेटाकुटीस आणले होते. त्यानंतर त्यांनी खुद्द बादशाही छावणीवरच हल्ला करून
एकच खळबळ उडवून दिली होती. शत्रू नुसतं त्यांच्या नावानं चळाचळा कापयचा. ३ नोव्हेंबर १६८९ साली रायगड पडल्यावर तह करून बंदिवासात जाणाऱ्या मातोश्री येसूबाई राणीसाहेब
आणि छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू हे अजून मोगलांच्या बंदिवासातच होते.
राहून राहून ही गोष्ट मराठ्यांना सतावीत आणि त्यातूनच काही धाडसी बेत आखले जात. काही करून शाहूंना मोगली बंदिवासातून बाहेर काढायचेच असा त्यांचा बेत. परंतू नुकताच दस्तुरखुद्द बादशहाच्या छावणीत या पठ्ठ्यानं धुडगुस घातल्याने मोगल कमालीचे घाबरले होते आणि ही जणू शाहूंना असंच छापा मारून सोडून नेणार अशी ताकीद देण्याची पूर्वसूचना म्हणून सतर्क बनले होते. त्यामुळे छावणी भोवताली सैन्याचा वेढा पक्का बसवला होता.
१९ डिसेंबरच्या बातमीनुसार बादशहाने गनिमांच्या परीपत्यासाठी बक्षीउल्मुल्क बहरामंदखान, फत्तेहुल्लाखान, मतलबखान व खुदाबंदाखान वगैरेंना नेमेले.
इकडे मावळ्यांचा बेत ठरला आणि बेत शिजवण्याचा दिवस देखील. धनाजी जाधवराव आणि त्यांचे निवडक सहकारी (जास्त पुरावे उपलब्ध नसल्याने मावळ्यांची संख्या अचूक सांगता येत नाही आणि काळ देखील तरीही तर्क) - मध्यरात्रीच्या काळोखात आपले इतर सहकारी मोजक्या अंतरावर ठेवून मोजक्या दोन-तीनशे सैन्यानिशी ब्रम्हपुरी येथील बादशाही छावणीवर झडप घातली बिनबोभाट कत्तली चालू केल्या.
काही मोगल पळू लागले काही ओरडू लागले अचानकच छावणीत गोंधळ माजला. धनाजी आया धनाजी आया भागो भागो अशा आरोळ्या उठत होत्या. खासे मोगली सरदार तंबूतून बाहेर येत नव्हते. अचानक झालेल्या हल्ल्यात सारे गडबडले पण मोगलांचे सैन्य जास्त असल्याने. धनाजींना काढता पाय घ्यावा लागला.
तेव्हा जर शाहू महाराजांची सुटका झाली असती तर आज इतिहास काही वेगळाच असता.
हा प्रसंग घडला तो दिवस होता 22 डिसेंबर १६९९
Labels:
ek faslela daaw,
maawale,
Marathi history,
marathi story,
mughal,
past,
play,
shivaji,
story
Wednesday, August 8, 2012
Kaahi Wichar - Marathi Thoughts for life
बारमाही कधीही वादळवारे, पाऊस पडणाऱ्या एका प्रदेशात एका धनिक शेतकऱ्याला घरकामासाठी, तबेला व घोड्यांची निगा राखण्यासाठी एक नोकर हवा होता. एका सकाळी एक मरतुकडासा मुलगा त्याच्याकडे आला. त्याने नोकरी मागितली. "तूकाय काय करू शकतोस?' असे मालकाने थोड्याशा टाळण्याच्या सुरातच त्याला विचारले. मुलगा म्हणाला, "वादळीवाऱ्यासह गडगडाटी धुवाधार पाऊस पडत असताना मी रात्री गाढ झोपू शकतो !'वेगळं वाटलं. शहराला जायची घाईही होती. त्याने मुलाला ठेवून घेतले. आठवड्याचा बाजारहाट करून तो आला. थकला होता. लगेच झोपायला गेला. मध्यरात्री सोसाट्याचा वारा, मोठा गडगडाट घेऊन धुवाधार पाऊस सुरू झाला. त्याची झोपमोड झाली. बाहेर पटांगणात गवत वाळायला टाकले होते. तबेल्यात घोड्यांसाठी गवत भरलेले नव्हते. पाणीही ठेवलेले नव्हते. त्याला काळजी वाटली.त्याने नोकराला जोरजोरात हाका मारल्या. त्याचा प्रतिसाद मिळाला नाही. घरात तो कुठेच नव्हता. शिव्या घालीत मालकाने रेनकोट चढवला; छत्री, विजेरी घेतली. माळावर गेला. सर्व गवत आवरून, त्याचे ढीग करून आच्छादून ठेवलेले दिसले. तसाच धावत तबेल्यात गेला. गव्हाणीत गवत, पाण्याची पातेली भरून ठेवलेली दिसली. घोडे चारापाणी खाऊन समाधानाने झोप घेत होते. त्याने कुतूहलाने पाहिले, वरच्या माळ्यावर जागा स्वच्छ करून त्याचा नवा नोकर शरीराचे मुटकुळे करून घोरत होता! निसर्गाचे एवढे तांडव बाहेर चालले होते, ते त्याच्या गावीही नव्हते.
नोकर शांत झोपू शकला. कारण त्याला ताण नव्हता. का नव्हता? झोपायला जायच्या आधीच त्याने आपली सर्व कामेव्यवस्थित पूर्ण केली होती. तिथे ताणाला आत शिरायला फटच नव्हती!
कुठलंही काम, प्रॉजेक्ट, कुठलीही कंपनी आणि कुठलाही अमेरिकन, युरोपियन क्लाएंट तुमच्या जिवापेक्षा मोठा नाही. तुमच्या आयुष्यासाठी नोकऱ्या, कंपन्या आहेत, त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही. कृपा करून जमेल, झेपेल एवढंच काम हातातघ्या; त्यासाठी आग्रह धरा. प्रतिष्ठा, पोस्ट, वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊनका. तुमच्या जिवापेक्षा मौल्यवान काहीही नाही, याचं भान ठेवा. कुटुंबाला वेळ द्या. घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम ऑफिसमधल्या कामावर होतो आणि घरचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देणारं ठरतं. ऑफिसमधले ताणतणाव, स्पर्धा, पक्षपात इ. इ. घरी घेऊन न येता, तिथंच विसरून या. स्वतःवर स्वतःच मर्यादा घालून घ्या. ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे. तुम्ही कुठं थांबायचं हे तुम्ही ठरवा. कितीही ताण असला, कुठलीही परिस्थिती ओढवली तरी घरी नीट समजावून सांगा. तुमच्या जिवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाही, याबद्दल खात्री बाळगा. ज्यांच्या सगळ्या आशा-अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आई-वडील, जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांना तुमचाच हात धरून आपली चिमुकली पावलं टाकायची आहेत ते चिमणे जीव यांना तुमची नितांत गरज आहे याची जाणीव ठेवा. त्यासाठी तुम्ही दीर्घायुषीस्वस्थ आणि आनंदी राहणं गरजेचं आहे. तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडी-निवडी जपा, स्वतःसाठी थोडातरी वेळ काढा. संगीत, व्यायाम, योगासने, वाचन इ.चा उपयोग करा.
हे सगळं सगळ्यांनाच माहिती असतं. तरीही आपण धावतो- ऊर फुटेस्तोवर आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही.
नोकर शांत झोपू शकला. कारण त्याला ताण नव्हता. का नव्हता? झोपायला जायच्या आधीच त्याने आपली सर्व कामेव्यवस्थित पूर्ण केली होती. तिथे ताणाला आत शिरायला फटच नव्हती!
कुठलंही काम, प्रॉजेक्ट, कुठलीही कंपनी आणि कुठलाही अमेरिकन, युरोपियन क्लाएंट तुमच्या जिवापेक्षा मोठा नाही. तुमच्या आयुष्यासाठी नोकऱ्या, कंपन्या आहेत, त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही. कृपा करून जमेल, झेपेल एवढंच काम हातातघ्या; त्यासाठी आग्रह धरा. प्रतिष्ठा, पोस्ट, वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊनका. तुमच्या जिवापेक्षा मौल्यवान काहीही नाही, याचं भान ठेवा. कुटुंबाला वेळ द्या. घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम ऑफिसमधल्या कामावर होतो आणि घरचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देणारं ठरतं. ऑफिसमधले ताणतणाव, स्पर्धा, पक्षपात इ. इ. घरी घेऊन न येता, तिथंच विसरून या. स्वतःवर स्वतःच मर्यादा घालून घ्या. ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे. तुम्ही कुठं थांबायचं हे तुम्ही ठरवा. कितीही ताण असला, कुठलीही परिस्थिती ओढवली तरी घरी नीट समजावून सांगा. तुमच्या जिवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाही, याबद्दल खात्री बाळगा. ज्यांच्या सगळ्या आशा-अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आई-वडील, जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांना तुमचाच हात धरून आपली चिमुकली पावलं टाकायची आहेत ते चिमणे जीव यांना तुमची नितांत गरज आहे याची जाणीव ठेवा. त्यासाठी तुम्ही दीर्घायुषीस्वस्थ आणि आनंदी राहणं गरजेचं आहे. तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडी-निवडी जपा, स्वतःसाठी थोडातरी वेळ काढा. संगीत, व्यायाम, योगासने, वाचन इ.चा उपयोग करा.
हे सगळं सगळ्यांनाच माहिती असतं. तरीही आपण धावतो- ऊर फुटेस्तोवर आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही.
दोन तत्त्वं :
"एक म्हणजे क्षुल्लक गोष्टींसाठी ताण निर्माण करू नका."
"दुसरं म्हणजे आयुष्याच्या अखेरीस सगळ्या गोष्टी क्षुल्लकच असतात "
Labels:
analogy,
article,
balance,
important values,
job,
life,
life balance,
marathi,
marathi article,
marathi values,
philosophy,
short story,
story,
vichar,
wichar,
work
Monday, May 23, 2011
Marathi Lekh: हे बाणेदार उत्तर देणारा तो विद्यार्थी होता?
तर हि गोष्ट आहे….,
संत एक नाथांची एकदा नदीवर स्नानास गेले असता बाहेर आल्यावर एक यवन (हिरवा मुसलमान) त्यांच्यार थुंकला त्यांनी परत नदीत बुडी मारली आणि बाहेर आले. यवन परत थुंकला त्यांनी परत बुडी मारली, अस १०८ वेळा घडल नाथांनी न त्याला शिव्या शाप दिले न काही बोलले.
शिक्षकांनी हि गोष्ट वर्गात सांगितली आणि त्यांनी यावरून या गोष्टीच तात्पर्य कुणी सांगेल का….?
असा प्रश्न केला ज्याने त्याने आपापल्या बुद्धी प्रमाणे पुढील उत्तर दिली :
१- नाथ किती महान होते ते कळत
२- नाथांची क्षमाशील वृत्ती दिसून येते
३ - माणसाने कस वागाव ते हि गोष्ट शिकवत
४ - एखाद्याला जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका
५ - रागावून त्रास तुम्हालाच
६ - शिक्षा करण्याचा अधिकार तुम्हाला नाही ते काम परमेश्वरच
७ - दुसर्लाया माफ करण्यातच खरा आनंद लपला आहे
अशी एकसो एक उत्तर विद्यार्थ्यांनी दिली पण एक विद्यार्थी मात्र गप्प होता. शिक्षकांनी त्याला विचारले तू काही उत्तर देत, त्यावर तो विद्यार्थी उठून उभा राहिला आणि म्हणाला, “गुरुजी माझ्या मित्रांनी जी उत्तर दिली, ती त्यांना शिकवण्यात आलेल्या शिकवणुकी नुसारच दिली पण, नाथांची हि गोष्ट ऐकल्यावर माझ्या लक्षात आल ते अस….,
“कि हिंदू समाज तेव्हा हि निद्रिस्त होता आणि आज हि आहे “.
शिक्षक म्हणाले, “काय बोलतोस तू…?, नाथांना चूक ठरवतोस…..?”.
तो विद्यार्थी म्हणाला, “ नाही गुरुजी मी नाथांना चूक ठरवणारा कोण….?, नाथ जे काही वागले ते त्यांच्या सन्यस्त वृत्तीला साजेसच होत या कृती मुळे ते संत पदाच्या सर्वोच्च स्थानी बसले पण…?, तो यवन जेव्हा १०८ वेळा थुंकत होता त्यावेळी हिंदू समाज निष्क्रीयतेने पाहत होता. त्याला या गोष्टीचा विरोध करावा असे मुळीच वाटले नाही नाथ संत असले तर तो हिंदू समाज संत नव्हता, जर वेळीच चोप दिला असता तर तो यवन नाथांवर १०८ वेळा थुंकला नसता नाथांनी जस त्याचं काम केल तस हिंदूंनी त्याचं काम करण योग्य होत न कि,
नाथांच्या या कृतीचा चुकीचा अर्थ विचार लोकात पसरवण .
हे बाणेदार उत्तर देणारा तो विद्यार्थी होता ...
स्वातंत्र्य वीर विनायक सावरकर दामोदर
!! जय हिंद, जय महाराष्ट्र !!!
II मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र-धर्म वाढवावा II
--
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
संत एक नाथांची एकदा नदीवर स्नानास गेले असता बाहेर आल्यावर एक यवन (हिरवा मुसलमान) त्यांच्यार थुंकला त्यांनी परत नदीत बुडी मारली आणि बाहेर आले. यवन परत थुंकला त्यांनी परत बुडी मारली, अस १०८ वेळा घडल नाथांनी न त्याला शिव्या शाप दिले न काही बोलले.
शिक्षकांनी हि गोष्ट वर्गात सांगितली आणि त्यांनी यावरून या गोष्टीच तात्पर्य कुणी सांगेल का….?
असा प्रश्न केला ज्याने त्याने आपापल्या बुद्धी प्रमाणे पुढील उत्तर दिली :
१- नाथ किती महान होते ते कळत
२- नाथांची क्षमाशील वृत्ती दिसून येते
३ - माणसाने कस वागाव ते हि गोष्ट शिकवत
४ - एखाद्याला जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका
५ - रागावून त्रास तुम्हालाच
६ - शिक्षा करण्याचा अधिकार तुम्हाला नाही ते काम परमेश्वरच
७ - दुसर्लाया माफ करण्यातच खरा आनंद लपला आहे
अशी एकसो एक उत्तर विद्यार्थ्यांनी दिली पण एक विद्यार्थी मात्र गप्प होता. शिक्षकांनी त्याला विचारले तू काही उत्तर देत, त्यावर तो विद्यार्थी उठून उभा राहिला आणि म्हणाला, “गुरुजी माझ्या मित्रांनी जी उत्तर दिली, ती त्यांना शिकवण्यात आलेल्या शिकवणुकी नुसारच दिली पण, नाथांची हि गोष्ट ऐकल्यावर माझ्या लक्षात आल ते अस….,
“कि हिंदू समाज तेव्हा हि निद्रिस्त होता आणि आज हि आहे “.
शिक्षक म्हणाले, “काय बोलतोस तू…?, नाथांना चूक ठरवतोस…..?”.
तो विद्यार्थी म्हणाला, “ नाही गुरुजी मी नाथांना चूक ठरवणारा कोण….?, नाथ जे काही वागले ते त्यांच्या सन्यस्त वृत्तीला साजेसच होत या कृती मुळे ते संत पदाच्या सर्वोच्च स्थानी बसले पण…?, तो यवन जेव्हा १०८ वेळा थुंकत होता त्यावेळी हिंदू समाज निष्क्रीयतेने पाहत होता. त्याला या गोष्टीचा विरोध करावा असे मुळीच वाटले नाही नाथ संत असले तर तो हिंदू समाज संत नव्हता, जर वेळीच चोप दिला असता तर तो यवन नाथांवर १०८ वेळा थुंकला नसता नाथांनी जस त्याचं काम केल तस हिंदूंनी त्याचं काम करण योग्य होत न कि,
नाथांच्या या कृतीचा चुकीचा अर्थ विचार लोकात पसरवण .
हे बाणेदार उत्तर देणारा तो विद्यार्थी होता ...
स्वातंत्र्य वीर विनायक सावरकर दामोदर
!! जय हिंद, जय महाराष्ट्र !!!
II मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र-धर्म वाढवावा II
--
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
Friday, May 13, 2011
दोन फुलपाखरे प्रेमात पडली होती
दोन फुलपाखरे प्रेमात पडली होती...एके दिवशी ते लपा-छपि खेळत होते, खेळताना .......
मुलगा फुलपाखरू :- चल एक छोटासा नवीन खेळ आपल्या दोघांच्यात ....
मुलगी फुलपाखरू :- हो चालेल !!
मुलगा फुलपाखरू :- आपल्या दोघांमध्ये, सकाळी सकाळी ह्या समोरच्या फुला मध्ये जो सर्वात प्रथम बसलेला असेल तो दुसऱ्या पेक्षा जास्त प्रेम करतो ....
मुलगी फुलपाखरू :- हो चालेल !!
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी, मुलगा फुलपाखरू त्या फुलाच्या जवळ येऊन उभा राहिला आणि ते फुल उमलण्याची वाट पाहू लागला जेणेकरून तो तिच्या आधी त्या फुलामध्ये बसेल आणि तिला दाखवून देईल कि त्याचे तिच्यावर खूप खूप प्रेम आहे ....
थोड्याच वेळात फुल उमलले ........ पाहतो तर काय ????????????
.
.
.
.
ती मुलगी फुलपाखरू त्या उमलेल्या फुला मध्ये मरून पडली होती . कारण, रात्रभर ती त्या फुला मधेच राहिली होती फक्त ह्या वेड्या अपेक्षेने कि सकाळ होताच आणि ते फुल उमलताच ती त्या मुलगा फुलपाखरू कडे आनंदाने झेप घेईल आणि त्याला दाखवून देईल कि ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करते ते ..........
Labels:
butterfly,
fulapakare,
lekh,
maathi,
marathi article,
prem,
story,
you are in love
Subscribe to:
Posts (Atom)
मूळ पान (Home Page)
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥