Showing posts with label marathi article. Show all posts
Showing posts with label marathi article. Show all posts

Tuesday, January 17, 2017

Father daughter caring - baba - lek article

बाबांवर प्रेम करणाऱ्या सर्व लेकींनी दोन मिनिटे वेळ काढून वाचाच !!
*****
न चुकता रात्री झोपताना गाढ विश्वासाने आपल्या अंगावर हात टाकून झोपणारी मुलगी
"आजपासून एकटी झोपणार म्हणते" तेंव्हा ती मोठी होते ....
**
शाळेत जाताना चिमुकल्या बोटांनी हात घट्ट धरणारी मुलगी आज रस्ता ओलांङताना दंड पकङून
"सांभाळून बाबा" असं म्हणते तेंव्हा ती मोठी होते.....
*
दोन केक आणी आईस्क्रिम खाऊन पण आपल्या वाटणीचा केक हक्काने खाणारी मुलगी आज
"बाबा एक घास हवा का?"
विचारते तेंव्हा ती मोठी होते.....
*
जरासे लागलं की आपण मलम लावताना आजून जोराने रङणारी मुलगी आज "बाबा ङोक दुखतय का? बाम लावू का ?" विचारते तेंव्हा ती मोठी होते......
*
चॉकलेटसाठी एक दोन रूपये हक्काने मागताना रडणारी मुलगी आज
"बाबा तुम्हाला पाहीजे तर माझ्या पिगी मधले पैसे घ्या" म्हणते तेंव्हा ती मोठी होते.......
*
मिकी माऊस आणी छोटा भिम बघण्यासाठी रिमोट हातात घट्ट धरणारी मुलगी आज "बाबा तुम्हाला बातम्या बघायच्या आहेत का ?" असं विचारते तेंव्हा ती मोठी होते.......
*
बाहेरगावी कामाला जाताना
बाबा जाऊ नको ना ssss म्हणत बॅग आत नेवून लपवणारी मुलगी आज
"बाबा तुमची बॅग भरू का विचारते" तेंव्हा ती मोठी होते......
*

Tuesday, July 14, 2015

Kavita: कसं जमतं गं तुला?

एकांत क्षणी प्रेयसी होणं...

निवांत क्षणी सखी होणं...

अपयशाच्या क्षणी आई होणं...

अन यशाच्या क्षणी सहचारिणी होणं...



किती बदलतेस भूमिका

किती वेळा, कशा?


कसं जमतं गं तुला?

भूक लागली असता भाकरी होणं,

स्पर्श हवा असता रेशीम होणं,

गंध हवा असता मोगरा होणं,

अन तहान लागली असता पाऊस होणं…


कसं कळतं गं तुला?

मला काय हवंय? केंव्हा? आणि कसं?


आणि जमतं तरी कसं

असं भाकरी, रेशीम, मोगरा होणं

किंवा पाऊस होऊन कोसळणं

मला जेंव्हा हवं तेंव्हा,

मला जसं हवं तसं…


मी मात्र गृहित धरतो

मला हव्या त्या वेळी, हव्या त्या रूपात

तू असशीलच हे

तुला ‘बायको’ नावाचं लेबल लावतो

आणि 'बायकोनी असंच असलं पाहिजे'

हे मानतच जातो मनोमन


माझं हे मानणं, माझी ही गृहितं, माझ्या ह्या अपेक्षा...

ह्याही तू स्वीकारतेस मनोमन...

अन वागतेस हे सारं सारं पूर्ण करण्यासाठी

कितीही अोझं वाटलं, कितीही त्रास झाला

तरी तो मला जाणवू न देता
हे सारं सारं जगणं

Dedicated 👆to all wonderful women 👍👍

कसं जमतं गं तुला?

Friday, July 10, 2015

Marathi Suvichar - Good morning

🌷 आजचा सुविचार 🌷

डोक शांत असलं की सहसा निर्णय चुकत नाहीत व भाषा गोड असली की माणसं तुटत नाहीत...... 
🌷  शुभ सकाळ  🌷

As always click on the image to enlarge and download:


Marathi kavita: Bayko

बायको.....!
बायको नसेल तेव्हा
घराला त्राण नसतो..!
बायको हाच खरा
घराचा प्राण असतो..!!
तिचे अस्तित्व हवे असते
सकारात्मक खलबतांसाठी..!
बायको म्हणजे बंदर असते
नवरा नावाच्या गलबतासाठी..!!
संसारातील जिवनसाथीसाठी
शोधाशोध नात्यांच्या डेऱ्यांसवे..!
बायको नावाचा शाश्वत आधार
मिळतो सप्तपदीच्या फेऱ्यांसवे..!!
सर्वांच्या आनंदासाठी
ती साथ देणारी सावली असते..!
दुखऱ्या क्षणी सावरायला
बायको नावाची माउली असते..!!
गंध सुखाचा अनुभवणारा
घरात सर्वांचा ताफा असतो..!
कुटुंबात दरवळणारा
बायको नावाचा चाफा असतो..!!
कर्तव्याच्या करारावरची
ती न पुसणारी शाई असते..!
प्रत्येकाची आवड जपणारी
बायको नावाची घाई असते..!!
आजारपणात फणफणणाऱ्या
ती लेकरांसाठी धट्टी असते..!
कपाळावरील मिठाची
बायको नावाची पट्टी असते..!!
स्वयंपाक, धुणे,दळणकांडप
तिचे राब-राबणारे हात असतात..!
प्रसंगी शिळेपाके चावणारे
बायको नावाचे दात असतात..!!
सर्व दुःखांना स्वतःमध्ये
ती मळणारी उंडी असते..!
जन्म दिलेल्या फुलझाडांसाठी
बायको नावाची कुंडी असते..!!
बायको नसेल तेव्हा
घराला त्राण नसतो..!
बायको हाच खरा
घराचा प्राण असतो..!!

Thursday, July 9, 2015

About Husbands

जरा बऱ नसेल तर नवरे
कित्ती मदत करतात,

तु झोप आता म्हणून
दहा वेळा उठवतात.

चहा कशात आहे,
साखर संपलीये का,
 गाळणं कुठाय?

सगळे डब्बे ओट्यावरच
मुक्कामाला येतात.

जरा बरं नसेल तर
नवरे कित्ती मदत करतात

टेबलावरची वर्तुळ सांगतात
किती झालाय चहा,

आवरणारे म्हणतात
तू झोपुनच रहा,

फडके म्हणुन नवाकोरा
नॅपकीन ही घेतात.

जरा बऱ नसेल तर
नवरे कित्ती मदत करतात

दुध जातंच ऊतु
जरी केलं 'वर्क फ्रॉम होम'
आणि ऑफिसला गेले तर
फोन वर फोन.

चौकशीच्या नादात
बायकोची झोप विसरतात.

जरा बरं नसेल तर
नवरे कित्ती मदत करतात

खरकटी भांडी आणि
पिम्पाखाली तळे,

कुकरच्या अगणित शिट्या
आणि पोळी भाजीची पार्सले.

यांच्या दर्शनानेच बहुदा
आजारपणे पळतात.

जरा बरं नसेल तर
नवरे कित्ती मदत करतात

रागावू नका, एखादा नवरा
असेलही जगावेगळा.

सन्माननीय अपवादांनी
स्वतःला वगळा.

पण असे नवरे नेहमी दुसऱ्या बायकांनाच मिळतात

कि पलीकडचे रंग
जरा जास्तच हिरवे दिसतात.
 म्हणे नवरे मदत करतात??

Wednesday, August 8, 2012

Sutti ka ghet naahi lok / लोक सुट्ट्या का घेत नाहीत

लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्रमाणे उडाणटप्पू वाटू शकतोकाही जणांची कार्यालयातील आपल्या अस्तित्वाबद्दल 'विशेषकल्पना असतेएकदा माझ्या एका मित्राशी फोनवर बोलत होतोसंवाद ऐका बरं " अरे यार चार चार ऑफिसर आहेत बँकेत पण माझ्यावरच कामाचा सगळा लोड पडतो." "काबाकीचे काही काम करत नाहीत?" मी विचारले... "काही काम करत नाहीत रे ...आणि आमचा म्यानेजर पण काही बोलत नाही ." एकूणच माझ्या या मित्राला बँकेत केवळ हमी एकटाच कामाने मारतो आहे असे वाटत होते . " मी एक उपाय सुचवू का ?" मी विचारले . तीन आठवडे सुट्टी घे" मी म्हणालो. "सुट्टी घेऊन काय करूउगाच पर्यटन वगैरे सारखे पैसे घालवायचे सल्ले देऊ नकोस. " तो डाफरला . 
"तीन आठवडे सुट्टी घेघरी पडे रहो करलायब्ररी मधून फिल्म च्या सी डीज आण , पुस्तके वाचपण या तीन आठवड्यात एक काम करायचे ...ते म्हणजे एकदाही बँकेच्या जवळपास ही जायचे नाही. " "त्याने काय होईल?" "तीन आठवड्याने तू गेल्यावर तुला कळेल की तू नव्हतास तरी बँक चालू राहिलीबंद पडली नाही . तुझ्या एकट्या मुळे बँक चालते असा तुझा समज एकदा दूर झाला की तुझे कामाचे प्रेशर पण गायब होईल बघ " माझ्या या फुकटच्या सल्ल्याचे त्याने काय केले माहित नाही...पण निदान नंतर मी कधी त्याचे रडगाणे ऐकले नाहीआपल्यामुळे ऑफिस चालते किंवा मी गेलो नाही तर फार कामे बंद पडतील असा एक गोड गैरसमज बरेच जण करून घेतात आणि मग सुट्टी नाकारून स्वतःलाच शिक्षा करत राहतात
माझे एक परिचित आहेतकधी त्यांनी सुट्टी घेतलेली असली तर दृश्य बघावेदर १५-२० मिनिटांनी कुण्या तरी सहकार्याला फोने करून "काय रे काय चालले आहे ?" असे म्हणून पिडत असतातआपल्या पाठीमागे ऑफिस मध्ये काही झाले आणि आपल्याला माहित नाही असे होऊ नये म्हणून ही धडपड . म्हणजे सुट्टी घेऊनही तिचा आनंद काही घेता येत नाहीअसुरक्षितातेची भावना हे पण काही जणाच्या सुट्टी न घेण्या मागचे कारण असू शकते . 
पाश्चात्य देशातील काही चांगली व्यवस्थापन तत्त्वे आपण उचलली पाहिजेत . तिथे सुट्ट्या कमी असल्या तरी त्या घेतल्याच पाहिजेत असा दंडक असतो . रजा विकणे ,साठवून ठेवणे , पेन्शनीत वर्ग करणे असले प्रकार नसतात . माणसाला विश्रांतीची गरज असते आणि त्या साठी रजा ही घेतलीच पाहिजे असा स्पष्ट आग्रह तिथे असतो .आपले म्हणजे असे आहे की व्यवस्थापकांनी त्यांच्या सोयीच्या आणि पगार जास्तीत जास्ती वसूल कसा करता येईल अशाच गोष्टी उचलल्या आहेत बाकीच्या नुसत्या गप्पानारायण मूर्तीचे एक भाषण मेल अधून मधून फोरवर्ड होत असतेत्यात त्यांनी लोकांना वेळेवर घरी जाकुटुंबासाठी वेळ काढा , इत्यादी इत्यादी उपदेश केला आहे.आपण लोक नुसतीच मेल वाचतो, "कसले स्पष्ट बोलतात होम्हणून त्यांचे कौतुक करतोआणि निदान रात्री आठ वाजता तरी निघायला हवे आता असा फुसका निश्चय करतो
सांगायचा मुद्दा काय की आपण काही तरी लंगड्या सबबी सांगून रजा घेण्याचे टाळतो . कुटुंब आणि स्वतःला जो वेळ द्यायचा तो देत नाही. कशासाठी हा सगळा खेळ मांडला आहे ते कळत नाही त्याला आणि मग आयुष्यावर रागवत राहतोरागावलेल्या माणसाचे आणि निर्मिती क्षमतेचे वाकडे असतेचिडलेलाथकलेला माणूस गाणे गाऊ शकत नाही.....आयुष्याचे संगीत शोधा...जगण्याची प्रेरणा शोधा...ऐका...एक सुट्टी घ्या... Ugichch

Kaahi Wichar - Marathi Thoughts for life


   बारमाही कधीही वादळवारेपाऊस पडणाऱ्या एका प्रदेशात एका धनिक शेतकऱ्याला घरकामासाठीतबेला व घोड्यांची निगा राखण्यासाठी एक नोकर हवा होता. एका सकाळी एक मरतुकडासा मुलगा त्याच्याकडे आला. त्याने नोकरी मागितली. "तूकाय काय करू शकतोस?' असे मालकाने थोड्याशा टाळण्याच्या सुरातच त्याला विचारले. मुलगा म्हणाला, "वादळीवाऱ्यासह गडगडाटी धुवाधार पाऊस पडत असताना मी रात्री गाढ झोपू शकतो !'वेगळं वाटलं. शहराला जायची घाईही होती. त्याने मुलाला ठेवून घेतले. आठवड्याचा बाजारहाट करून तो आला. थकला होता. लगेच झोपायला गेला. मध्यरात्री सोसाट्याचा वारामोठा गडगडाट घेऊन धुवाधार पाऊस सुरू झाला. त्याची झोपमोड झाली. बाहेर पटांगणात गवत वाळायला टाकले होते. तबेल्यात घोड्यांसाठी गवत भरलेले नव्हते. पाणीही ठेवलेले नव्हते. त्याला काळजी वाटली.त्याने नोकराला जोरजोरात हाका मारल्या. त्याचा प्रतिसाद मिळाला नाही. घरात तो कुठेच नव्हता. शिव्या घालीत मालकाने रेनकोट चढवलाछत्रीविजेरी घेतली. माळावर गेला. सर्व गवत आवरूनत्याचे ढीग करून आच्छादून ठेवलेले दिसले. तसाच धावत तबेल्यात गेला. गव्हाणीत गवतपाण्याची पातेली भरून ठेवलेली दिसली. घोडे चारापाणी खाऊन समाधानाने झोप घेत होते. त्याने कुतूहलाने पाहिलेवरच्या माळ्यावर जागा स्वच्छ करून त्याचा नवा नोकर शरीराचे मुटकुळे करून घोरत होता! निसर्गाचे एवढे तांडव बाहेर चालले होतेते त्याच्या गावीही नव्हते.
              
नोकर शांत झोपू शकला. कारण त्याला ताण नव्हता. का नव्हताझोपायला जायच्या आधीच त्याने आपली सर्व कामेव्यवस्थित पूर्ण केली होती. तिथे ताणाला आत शिरायला फटच नव्हती! 


             
कुठलंही कामप्रॉजेक्‍टकुठलीही कंपनी आणि कुठलाही अमेरिकनयुरोपियन क्‍लाएंट तुमच्या जिवापेक्षा मोठा नाही. तुमच्या आयुष्यासाठी नोकऱ्याकंपन्या आहेतत्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही. कृपा करून जमेलझेपेल एवढंच काम हातातघ्यात्यासाठी आग्रह धरा. प्रतिष्ठापोस्टवाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊनका. तुमच्या जिवापेक्षा मौल्यवान काहीही नाहीयाचं भान ठेवा. कुटुंबाला वेळ द्या. घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम ऑफिसमधल्या कामावर होतो आणि घरचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देणारं ठरतं. ऑफिसमधले ताणतणावस्पर्धापक्षपात इ. इ. घरी घेऊन न येतातिथंच विसरून या. स्वतःवर स्वतःच मर्यादा घालून घ्या. ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे. तुम्ही कुठं थांबायचं हे तुम्ही ठरवा. कितीही ताण असलाकुठलीही परिस्थिती ओढवली तरी घरी नीट समजावून सांगा. तुमच्या जिवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाहीयाबद्दल खात्री बाळगा. ज्यांच्या सगळ्या आशा-अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आई-वडीलजीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांना तुमचाच हात धरून आपली चिमुकली पावलं टाकायची आहेत ते चिमणे जीव यांना तुमची नितांत गरज आहे याची जाणीव ठेवा. त्यासाठी तुम्ही दीर्घायुषीस्वस्थ आणि आनंदी राहणं गरजेचं आहे. तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडी-निवडी जपास्वतःसाठी थोडातरी वेळ काढा. संगीतव्यायामयोगासनेवाचन इ.चा उपयोग करा. 
हे सगळं सगळ्यांनाच माहिती असतं. तरीही आपण धावतो- ऊर फुटेस्तोवर आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही.



दोन तत्त्वं : 

"
एक म्हणजे क्षुल्लक गोष्टींसाठी ताण निर्माण करू नका."
"
दुसरं म्हणजे आयुष्याच्या अखेरीस सगळ्या गोष्टी क्षुल्लकच असतात "

Wednesday, June 1, 2011

Olakhla ka sir

ओळखलत का सर मला ? पावसात आला कोणी ...
कपडे होते कर्दमलेले  केसांवरती पाणी …

क्षणभर बसला नंतर हसला, बोलला  वरती  पाहून ..
गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून …
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली ..
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली …
भिंत खचली , चूल विझली, होते नव्हते नेले ..
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी मात्र ठेवले … 

कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे ..
पडकी भिंत बांधतो आहे , चिखल गाळ काढतो आहे …
खिशाकडे हात जाताच, हसत हसत उठला ..
पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला …
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा..
पाठीवरती हात ठेऊन नुसते 'लढ' म्हणा 

Saturday, May 28, 2011

Inferences from Radheya - Ranjit Desai

Sorry for this post in English. But just because I felt like it, here goes. 
I wanted to summarize some of the nice situations in Karna's life describing some of his characteristic qualities.

1. Patience: The book shows that Karna has tremendous patience.  When Bheem is attacking Champanagari, Karna's kingdom during the time when the Pandava's are conducing the rajasuya yagna, he fights for the first day, but on the next day, he agrees to a compromise with bheem because hastinapur has informed him to do the same.

2. Love: It is clear that Karna is sincerely in love with his wife Vrushali, whom he refers lovingly as Vrushali. This true love is evident from the times when he declines initially to go to draupadi's swayamwar. When he says that he was about to be killed by the gandharvas in the war, Vrushali was the only person he remembered.

3. Does not stoop to the other person's level: When draupadi calls him a sutputra and declines to wed him, he does not cause any problems in the marriage. He says that considering the kind of lady she is she is not even eligible to become his dasi (slave). That shows that he did not do a tit - for - tat, but was able to think independently.

4. Loyalty: Despite knowing on innumerable occasions that Duryodhan is wrong, just out of friendship Karna sides with him. In some cases even when realizing that the same quality is going to result in his end. One occasion is when he goes at war with all the nearby kingdoms for making Duryodhan a powerful emperor, even at the cost of his own life. When he gives Kunti the promise (wachan) that he will not kill any of the pandavas, before the war, and only try to kill Arjun, because he had taken such a promise earlier. And he fullfills that promise even though he knows that he can get killed because of Parshurama's curse.

Where Krishna tells Karna that he is the eldest Kaunteya, and promises him to make him the emperor. He also mentions that life will be very different, he will be a proper Kshatriya, have five brothers who will worship him, and also have draupadi as his wife. He declines all of this, all for one reason,  his loyalty to Duryodhana, even though he is not the best of people in the world, it shows his quality of accepting someone as our one, even though there might be flaws in them.

5. Generousness: This one incident is a big indicator of Karna's generousness, and devotion. The time when Indra comes and takes the kawach kundal as a beggar. He happily removes them, even though he is forewarned by the Sun god that Indra will come to ask for them so that Arjun could possibly defeat him in the war. Kawach and kundal are the only things that Karna is born with that grant him divine power, and even those are given away.


6. Positivity: Even when his Kawach and kundal are taken away, Karna beautifully explains to his beloved wife Vrushali, why it is good that they are gone. The author has portrayed this very nicely.




Other instances:

+ Realizes the fall of pride: Where Karna's father Adhirath dies  - he gives a nice analogy of how life is like the charriot on the road. Even though his father tested the chariot by removing the linchpins, and the chariot is perfect, there are no guarantees of the road. He says that the test of the chariot test by removing the pins was like taking some small decision very proudly, which can result in very bad things in the end.


If you have read the book, or read other books like Mrutyunjay, please comment and feel free to add other qualities which you think showed Karna to be the great human being he was. Of course, considering that he was human he also made some errors in judgment by siding with Duryodhan. This discussion can include both.

Monday, May 23, 2011

Marathi Lekh: हे बाणेदार उत्तर देणारा तो विद्यार्थी होता?

तर हि गोष्ट आहे….,
संत एक नाथांची एकदा नदीवर स्नानास गेले असता बाहेर आल्यावर एक यवन (हिरवा मुसलमान) त्यांच्यार थुंकला त्यांनी परत नदीत बुडी मारली आणि बाहेर आले. यवन परत थुंकला त्यांनी परत बुडी मारली, अस १०८ वेळा घडल नाथांनी न त्याला शिव्या शाप दिले न काही बोलले.
शिक्षकांनी हि गोष्ट वर्गात सांगितली आणि त्यांनी यावरून या गोष्टीच तात्पर्य कुणी सांगेल का….?
असा प्रश्न केला ज्याने त्याने आपापल्या बुद्धी प्रमाणे पुढील उत्तर दिली :
१- नाथ किती महान होते ते कळत
२- नाथांची क्षमाशील वृत्ती दिसून येते
३ - माणसाने कस वागाव ते हि गोष्ट शिकवत
४ - एखाद्याला जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका
५ - रागावून त्रास तुम्हालाच
६ - शिक्षा करण्याचा अधिकार तुम्हाला नाही ते काम परमेश्वरच
७ - दुसर्लाया माफ करण्यातच खरा आनंद लपला आहे

अशी एकसो एक उत्तर विद्यार्थ्यांनी दिली पण एक विद्यार्थी मात्र गप्प होता. शिक्षकांनी त्याला विचारले तू काही उत्तर देत, त्यावर तो विद्यार्थी उठून उभा राहिला आणि म्हणाला, “गुरुजी माझ्या मित्रांनी जी उत्तर दिली, ती त्यांना शिकवण्यात आलेल्या शिकवणुकी नुसारच दिली पण, नाथांची हि गोष्ट ऐकल्यावर माझ्या लक्षात आल ते अस….,
“कि हिंदू समाज तेव्हा हि निद्रिस्त होता आणि आज हि आहे “.
शिक्षक म्हणाले, “काय बोलतोस तू…?, नाथांना चूक ठरवतोस…..?”.
तो विद्यार्थी म्हणाला, “ नाही गुरुजी मी नाथांना चूक ठरवणारा कोण….?, नाथ जे काही वागले ते त्यांच्या सन्यस्त वृत्तीला साजेसच होत या कृती मुळे ते संत पदाच्या सर्वोच्च स्थानी बसले पण…?, तो यवन जेव्हा १०८ वेळा थुंकत होता त्यावेळी हिंदू समाज निष्क्रीयतेने पाहत होता. त्याला या गोष्टीचा विरोध करावा असे मुळीच वाटले नाही नाथ संत असले तर तो हिंदू समाज संत नव्हता, जर वेळीच चोप दिला असता तर तो यवन नाथांवर १०८ वेळा थुंकला नसता नाथांनी जस त्याचं काम केल तस हिंदूंनी त्याचं काम करण योग्य होत न कि,
नाथांच्या या कृतीचा चुकीचा अर्थ विचार लोकात पसरवण .

हे बाणेदार उत्तर देणारा तो विद्यार्थी होता ...

स्वातंत्र्य वीर विनायक सावरकर दामोदर

!! जय हिंद, जय महाराष्ट्र !!!
II मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र-धर्म वाढवावा II
--
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

Friday, May 13, 2011

दोन फुलपाखरे प्रेमात पडली होती

दोन फुलपाखरे प्रेमात पडली होती...एके दिवशी ते लपा-छपि खेळत होते, खेळताना .......



मुलगा फुलपाखरू :- चल एक छोटासा नवीन खेळ आपल्या दोघांच्यात ....

मुलगी फुलपाखरू :- हो चालेल !!

मुलगा फुलपाखरू :- आपल्या दोघांमध्ये, सकाळी सकाळी ह्या समोरच्या फुला मध्ये जो सर्वात प्रथम बसलेला असेल तो दुसऱ्या पेक्षा जास्त प्रेम करतो ....

मुलगी फुलपाखरू :- हो चालेल !!



दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी, मुलगा फुलपाखरू त्या फुलाच्या जवळ येऊन उभा राहिला आणि ते फुल उमलण्याची वाट पाहू लागला जेणेकरून तो तिच्या आधी त्या फुलामध्ये बसेल आणि तिला दाखवून देईल कि त्याचे तिच्यावर खूप खूप प्रेम आहे ....





थोड्याच वेळात फुल उमलले ........ पाहतो तर काय ????????????

.

.

.

.

ती मुलगी फुलपाखरू त्या उमलेल्या फुला मध्ये मरून पडली होती . कारण, रात्रभर ती त्या फुला मधेच राहिली होती फक्त ह्या वेड्या अपेक्षेने कि सकाळ होताच आणि ते फुल उमलताच ती त्या मुलगा फुलपाखरू कडे आनंदाने झेप घेईल आणि त्याला दाखवून देईल कि ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करते ते ..........

Thursday, May 5, 2011

Facebook Varchi Maitri

मित्रांचे कट्टे आजकाल ओसंच पडतात..
कुणी 'orkut' वर तर कुणी 'Facebook' वर जमतात..

प्रत्यक्ष भेटीत सगळेच बुचकळयात पडतात..
कारण सगळे विषय 'chat' वरच संपलेले असतात..

मग 'chat' वर भेटूच " याचं Promise होतं..
आणि संभाषणातून 'Sign out' के लं जातं. ..

'लाल' 'हिरव्या ' दिव्यांच्या गर्दित मग हरवायला होतं...
घट्ट पकडलेलया हातांनाही सैल सुटायला होतं..

'Available' आणि 'Busy' मध्ये
प्रतेकाचा status घुटमळत राहतो...
आपणहून add केलेल्या मित्रपासून लापन्यकारिता
'Invisible'चा आडोसा घेतला जातो..

ताप आल्याच आजकाल आईच्या आधी 'Facebook' ला कळत..
औषध पेक्षा 'Take Care' च्या डोसेजनीच तापालाही पळायला होतं..

मनातलं सगळं 'Facebook' वर ओकायची
मैत्रीत गरजच का असावी?
नात्यांना धरून ठेवायला
'Net''ची जाळीच का असावी?

कधीतरी वाटतं पुन्हा कट्ट्यावर जमावं..
'chat' ला गप्पानी आणि 'Smile' ना हस्यानी replace करावं..

शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं
मैतीचं खरं समाधान खंद्यावरच्या हातात असतं....

...............एक मित्र

चला तर पूर्वी चे दिवस पुन्हा अनुभावुया ,
मैत्रीला technology पासून जपून ठेवुया ......

Monday, April 18, 2011

विचार करा....फक्त ५ मिनिट्स

एकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं...
असं वाटण्याची जागा,
मूल झालं की...
मोठं घर झालं की...
अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते .
दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत . ती जरा मोठी झाली की सारं ठीक होईल , अशी आपण मनाची समजूत घालू लागतो
मूळ पान (Home Page) लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥