Showing posts with label quotes. Show all posts
Showing posts with label quotes. Show all posts

Tuesday, December 13, 2016

Saint Gnyaneshwar - Suvichar

ज्ञानेश्वर महाराजांना वाळीत टाकले तेव्हा त्यांच्या मनात आलेले विचार : -

१) माझा जन्म कोठे व्हावा,कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत, हे माझ्या हाती नव्हते, त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो.
                ---------  संत ज्ञानेश्वर🌹


२) मी स्त्री व्हावे की पुरूष, काळा की गोरा, माझ्या शरिराची ठेवण, सर्व अवयव ठिकठाक असणे, हे देखील माझ्या हाती नव्हते. मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे, योग्य ती काळजी घेणे, हे माझ्या हाती आहे.
                --------- संत ज्ञानेश्वर🌹

३) माझ्या आई वडिलांची सांपत्तिक स्थिती, सामाजिक स्थान, त्यांचा स्वभाव, हे देखील माझ्या हाती नव्हते. त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे.
                  --------संत ज्ञानेश्वर🌹

४) सगळ्यांनाच सगळी सुखं मिळत नाहीत. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दु:खं असणारच आहेत. ती दु:खं कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही. त्यामुळे माझ्या दु:खांचे भांडवल न करता, मी त्या दु:खांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन.
                  --------- संत ज्ञानेश्वर🌹

५) माझ्या आसपास असलेल्या लोकांनी, माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी, माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे माझ्या हाती नसले, तरी मी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे. संयम, मृदु भाषा, मंगल कामना हे माझ्या हाती आहे.
                 --------- संत ज्ञानेश्वर 🌹

६) माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते. मात्र त्या वेळी सकारात्मक विचार अन् योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे.
                   ---------  संत ज्ञानेश्वर 🌹

७) हे विश्व मी निर्माण केलेले नाही. किंवा हे विश्व कसे असले पाहिजे, या माझ्या मताला देखील काही किंमत नाही. तेव्हा, हे असे का? ते तसे का? असे का नाही? वगैरे प्रश्न विचारत राहून वैतागण्या ऎवजी, जे चूक आहे, अयोग्य आहे, ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल. हे ही नसे थोडके !
                  ---------  संत ज्ञानेश्वर 🌹

८) कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दु:ख मिळणार आहे याची जाणीव ठेवून, मी माझ्या आसपासच्या दु:खी माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे.
                    --------- संत ज्ञानेश्वर 🌹

९) आज जरी यश, सुख, समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली, तरी उद्या अथवा केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेवून, मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे,
                ---------  संत ज्ञानेश्वर🌹

१०) मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दु:ख करत रहाण्या ऐवजी, जे काही मिळाले आहे, त्या बाबत मी आभारी असले पाहिजे. जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार  लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल, तेव्हा ती संधीb मी गमावता कामा नये.
                  ---------  संत ज्ञानेश्वर

Thursday, April 28, 2011

Marathi prem quote: Kunitari

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत कुणाची तरी हवी असते
पण असे का घडते की जेव्हा ती व्यक्ती हवी असते तेव्हाच ती आपल्या जवळ नसते..?

Thursday, December 23, 2010

Wednesday, June 24, 2009

Masta Ukhane

MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा...
लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा...
=========================
अमेरिकेचे प्रेसिडेण्ट आहेत बुश
सुंदर मुलगी दिसताच **** राव एकदम खुष !!
=========================

***रावांची थोरवी मी सांगत नाही
कितीही प्याले तरीही ते कधीही झिंगत नाहीत !!
=========================
इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव
**** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !!
=========================
सचीनच्या बॅट ला करते नमस्कार वाकून
***** रावांचे नाव घेते पाच गडी राखून

=========================

पावाबरोबर खाल्ले अमूल बटर...
***चे नाव घ्यायला अडलय माझ खेटर
=========================


एक होती चिऊ एक होती काऊ...
***रावांच नाव घेते , डोक नका खाऊ...
=========================
कोल्हापुरी लोकांचा आवडता उखाणा ...

अंबाबाईच्या देवळाला सोन्याचा कळस
*** चं नाव घ्यायचा मला नाही आळस
=========================
कुत्र्यात कुत्र अल्सेशिअन कुत्र
-----नी गळ्यात बांधले मंगळ्सूत्र
=========================
ईवले ईवले ह्रीण, त्याचे ईवले ईवले पाय,
****** राव आले नाहीत अजुन,
पिउन पडले की काय.......
=========================
चांदीच्या ताटात ठेवले होते गहू
लग्नच झाले नाही तर नाव कसे घेऊ
=========================
एक होती चिऊ एक होती काऊ
गणपत रावांच नाव घेते , डोक नका खाऊ
=========================
अंगणात पेरले पोतेभर गहू
लिस्ट आहे मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ
=========================
चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे
घास भरवते मरतुकड्या, थोबाड कर इकडे
=========================
बागेमध्ये असतात, गुलाबांच्या कळ्या
गणपतरावांचे दात म्हणजे दुकानाच्या फ़ळ्या
=========================
लग्नाच्या पंक्तीत घेतला उखाणा खास
अन गणपतरावांच्या घशात अडकला घास
=========================
आजघर माजघर माजघराला नाही दार
गणपतरावांच्या घरात मात्र विंडोज दोन हजार
=========================
कर्दळीच्या वनात चंडोल पक्षी लपला
........शी लग्न करून ......जन्माचा धुपला
=========================
कंप्युटरला असते फ़्लॉपी डिस्क
हिच्याशी लग्न करून मी घेतलिय मोठी रिस्क
=========================
रेशमी सदर्‍याला प्लास्टीकचे बक्कल
गणपतरावांना आहे टक्कल, पण डोक्यात नाही अक्कल
=========================
समुद्रच्या काठावर मऊ मऊ वाळू
गणपतराव दिसतात साधे, पण आतून एकदम चालू
=========================
लाडाने जवळ गेले, केली जरा घसट
गणपतराव एकदम खेकसले, फ़ारच बाई तिरसट
=========================
बदामाचा केला हलवा त्यात काजू टाकले किसुन.
*****राव बिड्या पितात संडासात बसून
=========================
आजकाल च्या लग्न ठरलेल्या मुलीसाठी..

मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन ......
मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन ......

आणि ....... रावना मिस कॉल देते एक रूपया बैलेंस राखून..
मूळ पान (Home Page) लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥