Sunday, September 9, 2012

Ek Kavita

धावत धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय,
रोज सकाळी खड्या आवाजात राष्टगीत म्हनायचय,
नव्या वहीचा वास घेत पहिल्या पानावर,
छान अक्षरात आपल नाव लिहायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय
दिवाळीच्या सुट्टीची वाट बघतच,
सहामाही परीक्षेचा अभ्यास करायचाय,
दिवसभर किल्ला बांधत मातीत लोळुन पन,
हात न धुता फराळाच्या ताटाला बसायचय,
आदल्या दिवशी राञी कितिहि फटाके उङले तरीही,
त्यातले न उङलेले फटाके शोधत फीरायचय,
सुट्टीनंतर सगळी मजा मिञांना सांगायला....मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
कितिहि जङ असु दे....जबाबदारीच्या ऒझ्यापेक्ष्या,
दप्तराच ऒक्ष पाठिवर वागवायचय,
कितिहि उकङत असु दे...वातानुकुलीत ऑफिसपेक्ष्या,
पंखे नसलेल्या वर्गात खिङक्या उघङुन बसायचय,
कितिहि तुटका असु दे...ऑफिसमधल्या ऍकट्या खुर्चीपेक्ष्या,
दोघांच्या बाकावर ३ मीञांनी बसायचय,
"बालपन देगा देवा" या तुकारामांच्या अभंगाचा अर्थ,
आता थोङा कळल्यासारखं वाटायला लागलय,
तो बरोबर आहेका हे गरुजींना वीचारायला...मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
मूळ पान (Home Page) लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥