Monday, December 31, 2012

Happy new year greeting

Happy new year - Marathi greeting

Saturday, December 8, 2012

Nostalgia war ek lekh


"एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावामग लक्षात येतंकी आपण गाभुळलेली चिंच अनेक वर्षात खाल्लेली नाहीजत्रेतमिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाहीचटक्यांच्या बिया घासून चटके द्यावेत असं आता वाटत नाही.कॅलिडोस्कोप पाहिलेला नाहीसर्कसमधला जोकर आपलं मन रिझवू शकत नाहीतसंचकापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही राहिलेला नाहीकापसाच्या म्हातारीने उडता उडता आपला बाळपणीचा काळ सुखाचा स्वत:बरोबर कधी नेला ते आपल्याचा कळलंच नाहीआता त्या ट्रिप्सनाहीतदोन दोन मुलांच्या जोड्या करून चालणं नाहीविटी दांडू नाहीसाबणाचे फुगे नाहीतप्रवासात बोगदा आला तर एक अनामिक हुरहुर नाही...... त्या उडणार्या म्हातारीने हे सगळे आनंदनेलेत्याच्या बदली तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिलंम्हणूनच ती अजून उडू शकतेआपण जमिनीवरच आहोत."
वपुंच्या वपूर्झा मधील ह्या ओळी वाचल्या अन् मन भुर्रकन काही वर्षे मागे गेलं...आणि सारं सारं बालपण आठवलं.
लाटेने कि काळाने नेला तो किनार्यावरचा वाळूचा किल्ला?
भोवर्याच्या रश्शीला लावलेला कोल्डड्रिंकच्या झाकणाचा बिल्ला...
हरवली कुठे तरी ती शाळेतली मुल्यशिक्षणाची वही,
इवलुश्या मार्कांच्या प्रगतीपुस्तकावर मारलेली बाबांची खोटी सही....
गेले कुठे ते चालताना "पॅकपॅकआवाज करणारे पायातले बूट?
"
मी नाही देणार जा माझं चॉकलेटम्हणत आवळलेली ती घट्ट मुठ....
किती जिव्हाळा होता डोकं टेकवलेल्या आईच्या हाताच्या उशीत?
ब्लँकेटहून जास्त उब होती त्या मायेच्या कुशीत...
हरवला तो प्रेमाचा घास...."चिऊताईदाखवत आईने भरवलेला...घरात  सांगता लपवून लपवून भेळ खायचा तो प्लॅन ठरवलेला?
गेले कुठे जत्रेतले ते गोड गोड म्हातारीचे केस?
छोट्याशा बुटांची आईने बांधलेली ती सुटलेली लेस....
गेली कुठे ती मामाच्या गावी जाणारी झुकझुक गाडी?
हरवली कुठे ती क्रिसमस मधली झिंगलमॅनची पांढरी दाढी?
धावत धावत ज्याचा पाठलाग केला तो धुरवाल्याचा धूर कुठे गेला?
शाळेत बडबड गीते गाताना एकत्र लावलेला तो सूर कुठे गेला?
झोपताना पाहिलेला तो चांदोमामा कुठे हरवला?
    पाठीवर लिहिणारा तो खडू कुणी पळवला?
कशाला आलं हे आपल्याला शहाणपण????
हरवलं त्यात ते सुंदर बालपण.......

खरंच बालपणीचा काळ किती सुखाचा नाआयुष्यातील काही अनमोल क्षणांची आठवण ते क्षण निसटुन गेल्यावरच प्रकर्षाने होतेपण बालपणीच्या काही आठवणीमनाच्या कोपर्यात अजुनहीदाटलेल्या असतातत्यांना हलकेच गोंजारल असता त्यांची सय अधिकच गडद होतेआपलं मनही किती विचित्र असतं नाजेंव्हा लहान असतो तेंव्हा पटकन मोठे व्हावेसे वाटतेशाळा सोडुनबाबांसारखे ऑफिसला जावेसे वाटते तर दादासारखे कॉलेजला जावंस वाटतंमुलींनाही आईसारखी साडी नेसुन स्वयंपाक करायला आणि ताईसारखा नट्टापट्टा करायला आवडतंमात्र आता मोठेझाल्यावर पुन्हा ते बालपणीचे दिवस आठवतात आणि नकळत डोळ्यात पाणी येतं.
पाखरे जर दिवस असते
आभाळी मी सोडिले नसते
फिरूनी त्यांना ह्रदयात मी
कोंडुन ठेविले असते
ते पाखरू मागे  वळले
मन का बोलाविते पुन्हा त्या दिवसांना
जे परतुन कधी ना आले...

Thursday, November 22, 2012

Ek Faslela Daaw (एक फसलेला डाव) - Marathi History



मोगली सैन्याशी निकराची पंजेफाड करत मावळी सेना लढतचं होती कारण परिस्थितीवर रडण्यापेक्षा परिस्थितीशी लढण्यात पुरुषार्थ मानणारी ही स्वराज्य सेना.

काळ होता १६९९ चा राजाराम महाराज गादीवर येऊन बराच काळ लोटला होता. मराठे सगळीकडेच मोघलांना धूळ चारत होती. भाउबंदकी नडली दुहीचा शाप पुन्हा एकदा दिसून आला.

एक लढवय्या आणि जिगरबाज सेनापतीस आपल्याच लोकांनीच दगा करून मारले होते. त्यांचे नांव संताजी घोरपडे.

पण धनाजी नावाचा वाघ अजून मैदान गाजवतच होता. मोगलांच्या प्रतिष्ठित सरदारांना धनाजी जाधव यांनी मेटाकुटीस आणले होते. त्यानंतर त्यांनी खुद्द बादशाही छावणीवरच हल्ला करून

एकच खळबळ उडवून दिली होती. शत्रू नुसतं त्यांच्या नावानं चळाचळा कापयचा. ३ नोव्हेंबर १६८९ साली रायगड पडल्यावर तह करून बंदिवासात जाणाऱ्या मातोश्री येसूबाई राणीसाहेब
आणि छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू हे अजून मोगलांच्या बंदिवासातच होते.

राहून राहून ही गोष्ट मराठ्यांना सतावीत आणि त्यातूनच काही धाडसी बेत आखले जात. काही करून शाहूंना मोगली बंदिवासातून बाहेर काढायचेच असा त्यांचा बेत. परंतू नुकताच दस्तुरखुद्द बादशहाच्या छावणीत या पठ्ठ्यानं धुडगुस घातल्याने मोगल कमालीचे घाबरले होते आणि ही जणू शाहूंना असंच छापा मारून सोडून नेणार अशी ताकीद देण्याची पूर्वसूचना म्हणून सतर्क बनले होते. त्यामुळे छावणी भोवताली सैन्याचा वेढा पक्का बसवला होता.

१९ डिसेंबरच्या बातमीनुसार बादशहाने गनिमांच्या परीपत्यासाठी बक्षीउल्मुल्क बहरामंदखान, फत्तेहुल्लाखान, मतलबखान व खुदाबंदाखान वगैरेंना नेमेले.

इकडे मावळ्यांचा बेत ठरला आणि बेत शिजवण्याचा दिवस देखील. धनाजी जाधवराव आणि त्यांचे निवडक सहकारी (जास्त पुरावे उपलब्ध नसल्याने मावळ्यांची संख्या अचूक सांगता येत नाही आणि काळ देखील तरीही तर्क) - मध्यरात्रीच्या काळोखात आपले इतर सहकारी मोजक्या अंतरावर ठेवून मोजक्या दोन-तीनशे सैन्यानिशी ब्रम्हपुरी येथील बादशाही छावणीवर झडप घातली बिनबोभाट कत्तली चालू केल्या.

काही मोगल पळू लागले काही ओरडू लागले अचानकच छावणीत गोंधळ माजला. धनाजी आया धनाजी आया भागो भागो अशा आरोळ्या उठत होत्या. खासे मोगली सरदार तंबूतून बाहेर येत नव्हते. अचानक झालेल्या हल्ल्यात सारे गडबडले पण मोगलांचे सैन्य जास्त असल्याने. धनाजींना काढता पाय घ्यावा लागला.

तेव्हा जर शाहू महाराजांची सुटका झाली असती तर आज इतिहास काही वेगळाच असता.

हा प्रसंग घडला तो दिवस होता 22 डिसेंबर १६९९

Lyrics Jeevanat hee ghadi - Kamapurta Mama


गीत - जीवनात ही घडी 
चित्रपट-कामा पुरता मामा (१९६५)
गीतकार - यशवंत देव
संगीत - यशवंत देव
स्वर - लता मंगेशकर

Lyrics :- जीवनात ही घडी अशीच राहू दे
प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे

रंगविले मी मनात चित्र देखणे
आवडले वेडीला स्वप्न खेळणे
स्वप्नातील चांदवा जीवास लाभू दे

हळूच तुला बघण्याचा छंद आगळा
लज्जेचा त्याविणका अर्थ वेगळा
स्पशार्तून अंग अंग धूंद होऊ दे

पाहू दे असेच तुला नित्य हासता
जाऊ दे असाच काळ शब्द झेलता
मिलनात प्रेमगीत धन्य होऊ दे

Saturday, November 10, 2012

Uncha maajha zoka lyrics उंच उंच माझा झोका


चांदणचाहूल होती कोवळ्या पाउली
माप मी ओलांडले अन् दूर गेली भातुकली
खेळण्याचे होते वय, अंगणाची होती सय
सोवळ्या मनात माझ्या भरे नभाचा आशय

थबकले उंबऱ्यात मी पाहुनी नवी पहाट
जणू जन्मले नव्याने भरता हा मळवट
हाती अमृताचा वसा, साथ देई माझा सखा
त्याच्या कृतार्थ डोळ्यांत, झुले उंच माझा झोका
उंच उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका

दाटुनिया येता मेघ भरे आकाश ओंजळ
माळ ही व्रताची जपता झाले घराचे देऊळ
झिजे पायरी होऊन जन्म चंदनासारखा
त्याच्या कृतार्थ डोळ्यांत, झुले उंच माझा झोका
उंच उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका

चांदणचाहूल होती कोवळ्या पाउली
माप मी ओलांडले अन् दूर गेली भातुकली

आरतीत तेवे माझ्या मंद ह्या व्रताची समई
तुळशीचे रोप माझे उंच आभाळात जाई
मीच ओलांडले मला, सोबतीस माझा सखा
येई कवेत आकाश, झुले उंच माझा झोका
त्याच्या कृतार्थ डोळ्यांत, झुले उंच माझा झोका

असे आगळे हे नाते ऐक ही रमा सांगते
बीज हे रुजे अंतरी, जगण्याचे फूल होते
अशा संसार गाण्याला त्याचा-माझा एक ठेका
त्याच्या कृतार्थ डोळ्यांत, झुले उंच माझा झोका
उंच उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका
 

Sunday, September 9, 2012

Ek Kavita

धावत धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय,
रोज सकाळी खड्या आवाजात राष्टगीत म्हनायचय,
नव्या वहीचा वास घेत पहिल्या पानावर,
छान अक्षरात आपल नाव लिहायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय
दिवाळीच्या सुट्टीची वाट बघतच,
सहामाही परीक्षेचा अभ्यास करायचाय,
दिवसभर किल्ला बांधत मातीत लोळुन पन,
हात न धुता फराळाच्या ताटाला बसायचय,
आदल्या दिवशी राञी कितिहि फटाके उङले तरीही,
त्यातले न उङलेले फटाके शोधत फीरायचय,
सुट्टीनंतर सगळी मजा मिञांना सांगायला....मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
कितिहि जङ असु दे....जबाबदारीच्या ऒझ्यापेक्ष्या,
दप्तराच ऒक्ष पाठिवर वागवायचय,
कितिहि उकङत असु दे...वातानुकुलीत ऑफिसपेक्ष्या,
पंखे नसलेल्या वर्गात खिङक्या उघङुन बसायचय,
कितिहि तुटका असु दे...ऑफिसमधल्या ऍकट्या खुर्चीपेक्ष्या,
दोघांच्या बाकावर ३ मीञांनी बसायचय,
"बालपन देगा देवा" या तुकारामांच्या अभंगाचा अर्थ,
आता थोङा कळल्यासारखं वाटायला लागलय,
तो बरोबर आहेका हे गरुजींना वीचारायला...मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

Aathwani poem

दहावीच्या माझ्या वर्ग मित्रांना काय हि कविता आठवते ?

आई एक नाव असत, घरातल्या घरात गजबजलेल गाव असत ,

सर्वात असते तेव्हा जाणवत नाही ,
आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही .

जत्रा पांगते पाल उठतात पोरक्या जमिनीत
उमाळे दाटतात .

आई मना मनात तशीच जाते ठेऊन काही
जीवाचं जीवाला कलावं असं जाते देऊन काही .

आई असतो एक धागा वातीला उजेड
दावणारी समयीतली जागा .

घर उजळत तेव्हा तीच नसत भान
विझून गेली अंधारात कि सैरा - वैरा
धावायलाही कमी पडत रान !

पिक येतात जातात , माती मात्र व्याकुळच
तिची कधीच भागत नाही तहान
दिसत काहीच नसत डोळ्यांना
तरी खोदत गेलो खोल -खोल
कि सापडतेच अन्त्कार्णतली खान .

याहून काय निराळी आई ?
ती घरात नाही ? तर मग कुणाशी बोलतात
गोट्यातील हम्ब्रानार्या गायी ?

आई खरचं काय असते ?
लेकराची मे असते
वासराची गाय असते
दुध वरची साय असते
धरणीची ठाय असते.

आई I असते जन्माची शिदोरी
सरतही I नाही
उरतही नाही !

आई एक नाव असते
घरातल्या घरात
गजबजलेल गाव असते !

Monday, August 27, 2012

What is love? प्रेम म्हणझे नेमके काय


मला माझ्या मित्राने विचारले कि प्रेम म्हणझे नेमके काय ?
मी त्याला सागितले की,
कितीही जवळ जाणार असेल तरी गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम....
दिवाळीला स्वतःसाठी साधे कपडे न घेता मुला-मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स आणि कपडे घेणारे बाबा म्हणजेप्रेम....
कितीही मस्ती केली व रात्री लेट झाले तरी आई-बाबाना न सांगता हळूच दार उघडणारे आजी-आजोबा म्हणजे प्रेम....
कितीही वाद झाले तरी दादा जेवलास का अशी विचाणारी बहिण म्हणजे प्रेम...
पगार कितीही कमी असेल तरी दिवाळी भाऊभीजला बहिणीच्या पसंतीचे घड्याळ घेणारा भाऊ म्हणजे प्रेम....
आणि या सर्वांची काळजी घेवून स्वतःची काळजी न करता सकाळी पहाटे उठून जेवणाचा डबा बनवणारी बायको म्हणजे प्रेम....

Wednesday, August 8, 2012

Sutti ka ghet naahi lok / लोक सुट्ट्या का घेत नाहीत

लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्रमाणे उडाणटप्पू वाटू शकतोकाही जणांची कार्यालयातील आपल्या अस्तित्वाबद्दल 'विशेषकल्पना असतेएकदा माझ्या एका मित्राशी फोनवर बोलत होतोसंवाद ऐका बरं " अरे यार चार चार ऑफिसर आहेत बँकेत पण माझ्यावरच कामाचा सगळा लोड पडतो." "काबाकीचे काही काम करत नाहीत?" मी विचारले... "काही काम करत नाहीत रे ...आणि आमचा म्यानेजर पण काही बोलत नाही ." एकूणच माझ्या या मित्राला बँकेत केवळ हमी एकटाच कामाने मारतो आहे असे वाटत होते . " मी एक उपाय सुचवू का ?" मी विचारले . तीन आठवडे सुट्टी घे" मी म्हणालो. "सुट्टी घेऊन काय करूउगाच पर्यटन वगैरे सारखे पैसे घालवायचे सल्ले देऊ नकोस. " तो डाफरला . 
"तीन आठवडे सुट्टी घेघरी पडे रहो करलायब्ररी मधून फिल्म च्या सी डीज आण , पुस्तके वाचपण या तीन आठवड्यात एक काम करायचे ...ते म्हणजे एकदाही बँकेच्या जवळपास ही जायचे नाही. " "त्याने काय होईल?" "तीन आठवड्याने तू गेल्यावर तुला कळेल की तू नव्हतास तरी बँक चालू राहिलीबंद पडली नाही . तुझ्या एकट्या मुळे बँक चालते असा तुझा समज एकदा दूर झाला की तुझे कामाचे प्रेशर पण गायब होईल बघ " माझ्या या फुकटच्या सल्ल्याचे त्याने काय केले माहित नाही...पण निदान नंतर मी कधी त्याचे रडगाणे ऐकले नाहीआपल्यामुळे ऑफिस चालते किंवा मी गेलो नाही तर फार कामे बंद पडतील असा एक गोड गैरसमज बरेच जण करून घेतात आणि मग सुट्टी नाकारून स्वतःलाच शिक्षा करत राहतात
माझे एक परिचित आहेतकधी त्यांनी सुट्टी घेतलेली असली तर दृश्य बघावेदर १५-२० मिनिटांनी कुण्या तरी सहकार्याला फोने करून "काय रे काय चालले आहे ?" असे म्हणून पिडत असतातआपल्या पाठीमागे ऑफिस मध्ये काही झाले आणि आपल्याला माहित नाही असे होऊ नये म्हणून ही धडपड . म्हणजे सुट्टी घेऊनही तिचा आनंद काही घेता येत नाहीअसुरक्षितातेची भावना हे पण काही जणाच्या सुट्टी न घेण्या मागचे कारण असू शकते . 
पाश्चात्य देशातील काही चांगली व्यवस्थापन तत्त्वे आपण उचलली पाहिजेत . तिथे सुट्ट्या कमी असल्या तरी त्या घेतल्याच पाहिजेत असा दंडक असतो . रजा विकणे ,साठवून ठेवणे , पेन्शनीत वर्ग करणे असले प्रकार नसतात . माणसाला विश्रांतीची गरज असते आणि त्या साठी रजा ही घेतलीच पाहिजे असा स्पष्ट आग्रह तिथे असतो .आपले म्हणजे असे आहे की व्यवस्थापकांनी त्यांच्या सोयीच्या आणि पगार जास्तीत जास्ती वसूल कसा करता येईल अशाच गोष्टी उचलल्या आहेत बाकीच्या नुसत्या गप्पानारायण मूर्तीचे एक भाषण मेल अधून मधून फोरवर्ड होत असतेत्यात त्यांनी लोकांना वेळेवर घरी जाकुटुंबासाठी वेळ काढा , इत्यादी इत्यादी उपदेश केला आहे.आपण लोक नुसतीच मेल वाचतो, "कसले स्पष्ट बोलतात होम्हणून त्यांचे कौतुक करतोआणि निदान रात्री आठ वाजता तरी निघायला हवे आता असा फुसका निश्चय करतो
सांगायचा मुद्दा काय की आपण काही तरी लंगड्या सबबी सांगून रजा घेण्याचे टाळतो . कुटुंब आणि स्वतःला जो वेळ द्यायचा तो देत नाही. कशासाठी हा सगळा खेळ मांडला आहे ते कळत नाही त्याला आणि मग आयुष्यावर रागवत राहतोरागावलेल्या माणसाचे आणि निर्मिती क्षमतेचे वाकडे असतेचिडलेलाथकलेला माणूस गाणे गाऊ शकत नाही.....आयुष्याचे संगीत शोधा...जगण्याची प्रेरणा शोधा...ऐका...एक सुट्टी घ्या... Ugichch

Kaahi Wichar - Marathi Thoughts for life


   बारमाही कधीही वादळवारेपाऊस पडणाऱ्या एका प्रदेशात एका धनिक शेतकऱ्याला घरकामासाठीतबेला व घोड्यांची निगा राखण्यासाठी एक नोकर हवा होता. एका सकाळी एक मरतुकडासा मुलगा त्याच्याकडे आला. त्याने नोकरी मागितली. "तूकाय काय करू शकतोस?' असे मालकाने थोड्याशा टाळण्याच्या सुरातच त्याला विचारले. मुलगा म्हणाला, "वादळीवाऱ्यासह गडगडाटी धुवाधार पाऊस पडत असताना मी रात्री गाढ झोपू शकतो !'वेगळं वाटलं. शहराला जायची घाईही होती. त्याने मुलाला ठेवून घेतले. आठवड्याचा बाजारहाट करून तो आला. थकला होता. लगेच झोपायला गेला. मध्यरात्री सोसाट्याचा वारामोठा गडगडाट घेऊन धुवाधार पाऊस सुरू झाला. त्याची झोपमोड झाली. बाहेर पटांगणात गवत वाळायला टाकले होते. तबेल्यात घोड्यांसाठी गवत भरलेले नव्हते. पाणीही ठेवलेले नव्हते. त्याला काळजी वाटली.त्याने नोकराला जोरजोरात हाका मारल्या. त्याचा प्रतिसाद मिळाला नाही. घरात तो कुठेच नव्हता. शिव्या घालीत मालकाने रेनकोट चढवलाछत्रीविजेरी घेतली. माळावर गेला. सर्व गवत आवरूनत्याचे ढीग करून आच्छादून ठेवलेले दिसले. तसाच धावत तबेल्यात गेला. गव्हाणीत गवतपाण्याची पातेली भरून ठेवलेली दिसली. घोडे चारापाणी खाऊन समाधानाने झोप घेत होते. त्याने कुतूहलाने पाहिलेवरच्या माळ्यावर जागा स्वच्छ करून त्याचा नवा नोकर शरीराचे मुटकुळे करून घोरत होता! निसर्गाचे एवढे तांडव बाहेर चालले होतेते त्याच्या गावीही नव्हते.
              
नोकर शांत झोपू शकला. कारण त्याला ताण नव्हता. का नव्हताझोपायला जायच्या आधीच त्याने आपली सर्व कामेव्यवस्थित पूर्ण केली होती. तिथे ताणाला आत शिरायला फटच नव्हती! 


             
कुठलंही कामप्रॉजेक्‍टकुठलीही कंपनी आणि कुठलाही अमेरिकनयुरोपियन क्‍लाएंट तुमच्या जिवापेक्षा मोठा नाही. तुमच्या आयुष्यासाठी नोकऱ्याकंपन्या आहेतत्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही. कृपा करून जमेलझेपेल एवढंच काम हातातघ्यात्यासाठी आग्रह धरा. प्रतिष्ठापोस्टवाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊनका. तुमच्या जिवापेक्षा मौल्यवान काहीही नाहीयाचं भान ठेवा. कुटुंबाला वेळ द्या. घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम ऑफिसमधल्या कामावर होतो आणि घरचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देणारं ठरतं. ऑफिसमधले ताणतणावस्पर्धापक्षपात इ. इ. घरी घेऊन न येतातिथंच विसरून या. स्वतःवर स्वतःच मर्यादा घालून घ्या. ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे. तुम्ही कुठं थांबायचं हे तुम्ही ठरवा. कितीही ताण असलाकुठलीही परिस्थिती ओढवली तरी घरी नीट समजावून सांगा. तुमच्या जिवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाहीयाबद्दल खात्री बाळगा. ज्यांच्या सगळ्या आशा-अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आई-वडीलजीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांना तुमचाच हात धरून आपली चिमुकली पावलं टाकायची आहेत ते चिमणे जीव यांना तुमची नितांत गरज आहे याची जाणीव ठेवा. त्यासाठी तुम्ही दीर्घायुषीस्वस्थ आणि आनंदी राहणं गरजेचं आहे. तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडी-निवडी जपास्वतःसाठी थोडातरी वेळ काढा. संगीतव्यायामयोगासनेवाचन इ.चा उपयोग करा. 
हे सगळं सगळ्यांनाच माहिती असतं. तरीही आपण धावतो- ऊर फुटेस्तोवर आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही.



दोन तत्त्वं : 

"
एक म्हणजे क्षुल्लक गोष्टींसाठी ताण निर्माण करू नका."
"
दुसरं म्हणजे आयुष्याच्या अखेरीस सगळ्या गोष्टी क्षुल्लकच असतात "
मूळ पान (Home Page) लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥